26/11 Mumbai Attack esakal
देश

26/11 Mumbai Attack : तो एक भ्याड हल्ला अन् हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली

Mumbai terror attack : २६ नोव्हेंबर २००८ या काळ्या दिवशी झालेला मुंबई अटॅक हा अत्यंत दुर्दैवी होता.

Saisimran Ghashi

२६ नोव्हेंबर २००८, ही तारीख मुंबईचं हृदय चिरत राहणारी आहे. त्या रात्रीचा अंधार आजही लाखो भारतीयांच्या मनावर एका दुःस्वप्नासारखा गडद आहे. ज्या मुंबईनं आयुष्याचं भान दिलं, जिथं प्रत्येक पाऊल उमेदीचा मार्ग शोधतं, तीच मुंबई त्या रात्री हतबल आणि वेदनेत पिळवटून गेली होती.

१० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि तीन दिवस एका शांत, धावत्या शहराला जखडून ठेवलं. हॉटेल ताज, ओबेरॉय ट्रायडंट, नरीमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्टेशन, आणि कामा हॉस्पिटल या ठिकाणी गोळीबाराचा कहर सुरु झाला. हा केवळ दहशतवाद नव्हता, तर मानवतेविरोधातला घृणास्पद हल्ला होता.

ताज हॉटेलमध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि आग, सीएसटी स्टेशनवरील बेसावध प्रवाशांवर गोळ्या झाडणं, आणि नरीमन हाऊसमधील अडकलेल्या कुटुंबांचा थरकाप उडवणारा संघर्ष. प्रत्येक घटना मुंबईचं रक्त सांडत होती. परंतु या सगळ्यातही, आपले पोलीस, एनएसजी कमांडो, आणि सामान्य नागरिकांनी दाखवलेलं धैर्य अविस्मरणीय आहे. तुकाराम ओंबळे यांनी स्वतःचा जीव गमावून अजमल कसाबला जिवंत पकडून एक महत्त्वाचं प्रमाण मिळवलं. या शौर्याची गाथा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल.

पीडितांचे प्रश्न

१६६ निष्पाप जणांनी आपले प्राण गमावले. हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली. तेथील दुःख कधीच भरून न येणारे आहे. काहींनी आपले प्रियजन गमावले, तर काहींनी आपले हातपाय. मुंबईचं यंत्रणा पुन्हा सुरु झाली, पण या हल्ल्याचा मानसिक घाव कुठल्याही मलमाने भरून येणारा नाही.

या घटनेनंतर भारतानं आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आजही प्रश्न राहतो: आपण पुरेसे सजग झालो का? दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नेटवर्क्सचा नायनाट झाला का? अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकार आणि सामान्य नागरिकांनी सतर्क राहायला हवं.

२६/११ च्या हल्ल्याने केवळ मुंबई नव्हे तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला एकत्र आणलं. जात, धर्म, भाषा विसरून प्रत्येकाने "हम सब एक हैं" हा संदेश दिला. दहशतवाद्यांच्या क्रूर हेतूंना मानवतेच्या नात्यानं चोख प्रत्युत्तर दिलं.

आज, २६/११ च्या स्मृतीदिनी, आपण त्या सर्व शूरवीरांना श्रद्धांजली वाहतो ज्यांनी आपलं आयुष्य बलिदान केलं. आपण त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकतेचा हात पुढे करू शकतो. हा दिवस आपण विसरू शकत नाही, पण त्यातून शिकून पुढं जाणं आपलं कर्तव्य आहे.

मुंबईचं मन आजही जखमी आहे, पण तिचं उमेदीचं नवं पान लिहिण्यासाठी ती तत्पर आहे. "सपनों की नगरी" या शब्दांमध्ये जिवंत राहणाऱ्या या मुंबईला त्रास देणाऱ्या अंधाऱ्या दिवसांच्या आठवणी विसरणं कठीण आहे. पण या वेदनेतून उभारीचं नवं विश्व घडवणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT