Crime News Team eSakal
देश

महानवमीला घेतला तरुणाचा बळी; अघोरी कृत्यानं हादरलं गाव

आरोपी दिवसभर बळीच्या शोधात होता असंही गावकऱ्यांनी सांगितलं.

सुधीर काकडे

नवरात्रीच्या पार्श्वभुमिवर रांचीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. रांचीच्या तमाडमध्ये 35 वर्षीय तरुणाचा बळी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तमाड परिसरातील प्रसिद्ध दायरी मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या पिपैडी गावात घडली आहे. ज्या व्यक्तीनं हा खुन केला ती सकाळपासून आज महानवमी असून कुणाचा तरी बळी द्यावा लागेल असं लोकांना सांगत होती असंही समोर आलंय. ठार झालेला तरुण पिपैडी गावाचा रहिवासी होता.

ग्रामीण पोलिस आयुक्त नौशाद आलम यांनी सांगितले की, पिपैडी गावात राहणारा तरुण कुमार महतो गुरुवारी सकाळपासून आज महानवमी आहे, आज कुणाचा बळी द्यावा लागेल असं म्हणत होता. मात्र हा सहज असं बोलत असावा असं समजून लोकांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याने हरधन लोहरा नावाच्या तरुणाला पकडून चाकूने त्याचा गळा कापला. आरडाओरडा ऐकून गोळा झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीला पकडले आणि हरधनला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात हरधनचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात देखील मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून चाकूही जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करण्यात करत असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT