sharad pawar main.jpg 
देश

बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले...

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. देशातील बहुतांश विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणांबाबत यापूर्वी मांडलेल्या भूमिकेवरुन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु, शरद पवार यांनी आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन एकापाठोपाठ एक टि्वट करत आपली भूमिका काय होती याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

नवीन कृषी कायदे बाजार समितीच्या अधिकारांना प्रतिबंधित करतात. म्हणजेच खासगी बाजाराकडून आकारणी व शूल्क गोळा करणे, वाद सोडवणे, कृषी-व्यापार परवाना आणि इ-ट्रेडिंगचे नियम आदी. नवीन कायद्यांचा किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदीच्या पायाभूत सुविधांवर विपरित परिणाम होईल आणि त्यामुळे मंडई व्यवस्था कमजोर होईल, असे ते म्हणाले.

सुधारित अत्यावश्यक वस्तू कायद्याबद्दल मलाही काळजी आहे. या कायद्यानुसार बागायती उत्पादनांच्या दरात 100 टक्के वाढ झाली आणि नाशवंत वस्तूंच्या किंमतीत 50 टक्के वाढ झाली तरच सरकार किंमत नियंत्रणासाठी हस्तक्षेप करेल, अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, शरद पवारांनी कृषी मंत्रिपदाच्या त्यांच्या कार्यकाळात मांडलेल्या सुधारणांचा मसुदा आणि मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांतील बदल एकत्रित मांडले आहेत.

सुधारणा होणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. बाजार समितीतील बदलांना कोणी रोखू शकत नाही.पण यावर सकारात्मक पद्धतीने वाद घातला जात असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की, ही व्यवस्था कमजोर किंवा उद्ध्वस्त केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

SCROLL FOR NEXT