Subhash Chandra Bose esakal
देश

Subhash Chandra Bose : नेताजींनीच गांधींना सर्वप्रथम म्हटलं होतं राष्ट्रपिता; जाणून घ्या रंजक कहाणी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात आणि महात्मा गांधी यांच्यातले वाद केवळ तात्विक होते. हे मतभेद होते मनभेद नाही हे सिध्द करणारा प्रसंग.

सकाळ डिजिटल टीम

Netaji Subhash Chandra Bose : स्वातंत्र्या पूर्वी ६ जुलै १९४४ ला रेडीयो रंगून वरून महात्मा गांधींना नवं नाव देण्यात आलं. ते म्हणजे राष्ट्रपिता. गांधीजींसाठी या सर्वोच्च सन्मानीय शब्दाचा वापर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला होता. यामुळे गांधींच नाव इतिहासात याच शब्दाने नोंदवलं गेलं.

असं सांगितलं जातं की, नेताजी आणि गांधी हे एकमेंकांचा फर सन्मान करायचे. पण तरीही दोघांमध्ये काही मुद्द्यांना घेऊन मतभेद होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात आणि महात्मा गांधी यांच्यातले वाद केवळ तात्विक होते. हे मतभेद होते मनभेद नाही हे सिध्द करणारा प्रसंग.

नेताजींचं म्हणणं होतं की, अहिंसेच्या मार्गावर चालून स्वातंत्र्य मिळू शकतं असं नाही. अहिंसा ही एक विचारधारा असू शकते पण तो पंथ नाही. राष्ट्रीय आंदोलन हिंसामुक्त असणं चांगलंच आहे, पण वेळ प्रसंगी शस्त्रपण उचललेच जायला हवेत असं त्यांचं मत होतं.

तर याच्या उलट गांधीजींच मत होतं की, त्यांना वाटत की, अहिंसा हाच देशाला स्वतंत्र करण्याचा एकमेव मार्ग आहे. गांधीजींनी आपल्या अनेक अहिंसा आंदोलनांनी इंग्रजांना बऱ्याचदा वाकवलं आहे.

राष्ट्रपिता ही घोषणा अधिकृतरित्या नाही

देशातले लोक गांधीजींना राष्ट्रपिता म्हणत असले तरी सरकारी पातळीवर याची अधिकृत घोषणा झालेली नाही. संविधानुसार ते शक्य नाही. म्हणूनच गृह मंत्रालयाने लखनौच्या बाल आरटीआय कार्यकर्ती ऐश्वर्या पाराशरला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, महात्मा गांधींना राष्ट्रपिता घोषित करण्यासंदर्भात कोणतीही अधिसुचना दिली जाऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Latest Marathi News Live Update : पुण्यात विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईड उन्हाळी शिबिर; ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

Mobile Booster Tips : तुमचा मोबाईल सतत हँग होतोय? स्लो फोनला ५ मिनिटांत बनवा सुपरफास्ट, एकदा वापरून पाहा 'ही' सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT