sushma swaraj
sushma swaraj 
देश

इराकमधील भारतीयांच्या हत्येचा कोणताही पुरावा नाही: सुषमा स्वराज

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, ता.26 (पीटीआय) : इराकच्या मोसुलमधून अपहरण करण्यात आलेल्या 39 भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्याचे पाप मी करणार नाही, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत सांगितले.

त्या म्हणाल्या की, जोपर्यंत तेथील भारतीय नागरिक मृत झाल्याचे पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत सरकार त्यांचा शोध घेतच राहील. 39 भारतीय मृत झाले असल्याचे कोणतेही पुरावे जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत यासंदर्भातील फाइल बंद करणार नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्याचे पाप करणार नाही, असे स्वराज म्हणाल्या.

इराकच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चेनंतर दोन दिवसांनी त्यांनी ही माहिती लोकसभेत दिली. मी कधीही दिशाभूल करणार नाही. दिशाभूल करून काय फायदा मिळणार आहे, हे मला विरोधी पक्षाच्या सदस्यांना विचारायचे आहे. जनतेची दिशाभूल करून माझ्या सरकारला काय फायदा मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT