देश

काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार : नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार आहे. काश्मीरमधील तरुणांना आता सर्व हक्क मिळणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.

मोदी म्हणाले, की काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. कलम 370 आणि 35 ए हे आता भूतकाळ झाले आहे. काश्मीरमधील पोलिसांना आता सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. काश्मीरमधील अनेक विकासकामे वेगाने होत आहेत. काश्मीरमधील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. काश्मीरमध्ये उद्योग उभारणीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. काश्मीरच्या विकासाला प्राधान्य देणे हेच आमचे लक्ष्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT