देश

काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार : नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार आहे. काश्मीरमधील तरुणांना आता सर्व हक्क मिळणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.

मोदी म्हणाले, की काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. कलम 370 आणि 35 ए हे आता भूतकाळ झाले आहे. काश्मीरमधील पोलिसांना आता सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. काश्मीरमधील अनेक विकासकामे वेगाने होत आहेत. काश्मीरमधील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. काश्मीरमध्ये उद्योग उभारणीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. काश्मीरच्या विकासाला प्राधान्य देणे हेच आमचे लक्ष्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT