Accident 
देश

Rajasthan Accident: लग्न सोहळा पार पाडून परतत होते; भरधाव ट्रकने व्हॅनला दिली धडक, 9 तरुणांचा मृत्यू

Road Accident Jhalawar district: राजस्थानच्या झालवार जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. एका ट्रक आणि व्हॅनच्या धडकेत ९ तरुणांचा मृत्यू झाला आहे.

कार्तिक पुजारी

जयपूर- राजस्थानच्या झालवार जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. एका ट्रक आणि व्हॅनच्या धडकेत ९ तरुणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० जणांचा ग्रुप मध्य प्रदेशातील एक लग्न सोहळा आटपून राजस्थानमध्ये परतत होता, त्यावेळी हा अपघात झाला आहे. (Nine people died in a road accident Rajasthan Jhalawar district returning from a marriage procession)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरुन पसार झाला होता. त्यानंतर ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

एका भरधाव ट्रकने व्हॅनला धडक दिली. त्यात व्हॅनचा पूर्ण चुराडा झाला आहे. अकलेरा पोलीस स्टेशन अधिकारी संदीप बिश्नोई यांनी सांगितलं की, अकलेराच्या जवळ डूंगर गावाच्या बागरी समाजाचे लोक शनिवारी आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी मध्य प्रदेशात गेले होते. परत गावी परतत असताना त्यांच्या व्हॅनचा अपघात झाला. पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत. संबंधितांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे. (Accident News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT