NITI Aayog 4th Health Index
NITI Aayog 4th Health Index 
देश

आरोग्य सेवांच्या बाबतीत केरळ देशात अव्वल; उत्तर प्रदेश सर्वात वाईट

सकाळ डिजिटल टीम

NITI Aayog 4th Health Index : कोरोनामुळे (Corona) मागच्या वर्षात आपल्या आरोग्य व्यवस्थेला बराच ताण सहन करावा लागला आहे, या काळात देशभरातील ढासळलेली आरोग्य सेवा आपण सर्वांनी पाहिली आहे. या दरम्यान, NITI आयोगाने देशातील राज्यांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये एकूणच आरोग्य सेवा चांगल्या आहेत (Health Performance) आणि ज्या राज्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे त्यांची रँक जाहीर केली आहे.

NITI आयोगाने सोमवारी आरोग्य निर्देशांक जारी केला. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारली आहे, तर उत्तरेकडील राज्यांची अवस्था बिकट आहे. NITI आयोगाच्या आरोग्य निर्देशांकानुसार (NITI Aayog 4th Health Index) एकूण आरोग्य सेवा कामगिरीच्या बाबतीत केरळ पुन्हा एकदा राज्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती ही सर्वात वाईट आहे.

तामिळनाडू आणि तेलंगणा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, मिझोराम लहान राज्यांमध्ये आरोग्य सेवा कामगिरीमध्ये (Health Performance) अव्वल राहिले आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये, दिल्ली व जम्मू आणि काश्मीर एकूण कामगिरीच्या बाबतीत आतापर्यंत तळाशी होते, परंतु परिस्थिती सुधारण्याच्या बाबतीत दोन्ही राज्ये आघाडीवर पोहोचली आहेत. त्याचप्रमाणे, 2018-19 च्या तुलनेत 2019-20 मध्ये परिस्थिती सुधारण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या यादीत उत्तर प्रदेश 19व्या तर बिहार 18व्या क्रमांकावर आहे. चांगली आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या बाबतीत, मिझोराम लहान राज्यांमध्ये प्रथम, तर त्रिपुरा आणि नागालँड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, केंद्रशाषि प्रदेशांमध्ये दादरा नगर हवेली पहिल्या क्रमांकावर आणि चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT