nitish kumar  sakal
देश

नितीश कुमारांचा पुन्हा भाजपविरोधी सूर

विशेष राज्याचा दर्जा व जातीनिहाय जनगणनेवर ठाम

उज्वलकुमार

पाटणा : बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा नव्याने केली आहे. यामुळे राज्यात भाजपशी युती करून सत्तेवर आलेला संयुक्त जनता दल(जेडीयू) पक्ष व नितीश कुमार यांनी नवा खेळ मांडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्‍याची मागणी आता करण्यात मुख्यमंत्र्यांचा काय हेतू असू शकतो, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. जेव्हा केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार होते, त्यावेळी याच मुद्दावरून नितीश कुमार यांचे काँग्रेसशी मतभेद झाले होते. आता ज्या आघाडीतील ते भागीदार आहे, ती राष्ट्रीय लोकशाही आघाडी केंद्रात सत्तेवर आहे. नितीश कुमार भाजपबरोबर असले तरी त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व ठेवू इच्छितात, असे जाणकारांचे मत आहे.

दोन दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांचे निकटचे मंत्री विजेंद्र प्रसाद यादव यांनी नीती आयोगावर टीका केली होती. बिहार सरकारने केलेल्या विविध कामांकडे नीती आयोगाने दुर्लक्ष केल्यानेच बिहारला कमी दर्जाची श्रेणी मिळाली, असा आरोप करीत विशेष राज्याची मागणी करून आम्ही थकलो आहोत, असे यादव म्हणाले होते. दुसरीकडे नितीश कुमार म्हणाले की, आम्ही विशेष राज्याच्या दर्जाची मागणी सोडलेली नाही. गरीब राज्यांना मदत करणे हे केंद्राचे काम आहे. जातीनिहाय जनगणनेवरील प्रश्‍नाला उत्तर देताना या मुद्यावर आम्ही सर्व पक्षांबरोबरील बैठकीनंतर घेऊन निर्णय घेऊ. जातीनिहाय जनगणना करण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने कोर्टात नुकतेच स्पष्ट केले आहे.

भविष्यात स्वतंत्र मार्ग निवडण्याची नांदी

बिहारला विशेष राज्याची दर्जा आणि जातीनिहाय जनगणनेवर नितीश कुमार यांच्या भूमिकेने भापजमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री नितीश कुमार यांच्या भूमिकेविरोधात बोलत आहेत. ‘एनडीए’तील दोन पक्षांचे दोन वेगवेगळ्या मुद्यांवरील मतांतरामुळे भविष्यात दोघांनी वेगवेगळ्या मार्ग निवडले तर आश्‍चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT