Rajnath Sinh 
देश

चीनच्या सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला पण...; राजनाथ सिंह यांचे लोकसभेत निवेदन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये पुन्हा एकदा भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले. यामध्ये ३० जवान जखमी झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिलं. ('No death, no major injuries': Rajnath in Lok Sabha on LAC clashes)

राजनाथ सिंह म्हणाले की, अरुणाचलप्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये ९ डिसेंबर २०२२ रोजी PLA (पिपल्स लिबरेश आर्मी) ट्रुप्सने तवांग सेक्टरच्या यांग परिसरात घुसखोरीचा करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याच्या घुसखोरीचा भारताच्या सैन्याने निडरतेने प्रतिकार केला. यावेळी दोन्हीकडच्या सैन्यात संघर्ष झाला. भारतीय सैन्याने वीरतेने शत्रुच्या सैन्याला परत जाण्यास भाग पाडलं. या संघर्षात दोन्हीकडचे सैनिक जखमी झाले. मात्र एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नसून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

हेही वाचा सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

दरम्यान या घटनेनंतर लोकल कमांडरने ११ डिसेंबर रोजी एक फ्लॅग मिटींग घेतली. तसेच चीन सैन्याला अशाप्रकारे घुसखोरी करण्यास बंद करण्यास सांगितलं आहे. आपलं सैन्य सीमेची सुरक्षा कऱण्यास तत्पर असून सैन्याच्या वीरतेवर सर्वांना विश्वास असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT