venkaiah naidu sakal
देश

शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण नको: नायडू

राजकारण केवळ राजकीय क्षेत्रातच व्हावे. सरकारला जाब विचारण्याचा हक्क जनतेला असला तरी नव्या कल्पना स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

गुरुग्राम ः शेतकऱ्यांच्या समस्यांचे मतांसाठी राजकारण करू नये. त्यामुळे देशात विभाजन होईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले.

थोर शेतकरी नेते सर छोटू राम यांच्याविषयीच्या पाच खंडांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, राजकारण केवळ राजकीय क्षेत्रातच व्हावे. सरकारला जाब विचारण्याचा हक्क जनतेला असला तरी नव्या कल्पना स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे.

संपूर्ण देशात एकच बाजारपेठ का असू शकत नाही, असा सवाल करून ते म्हणाले की, आंध्र प्रदेशचा तांदूळ तमिळनाडूत विकला जाऊ शकत नाही हे हास्यास्पद आहे. संपूर्ण देश एकेरी अन्न विभाग असला पाहिजे आणि त्यावर कोणतीही बंधने असू नयेत. शेती शाश्वत आणि किफायतशीर ठरावी म्हणून सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला जावा, असेही नायडू नमूद केले.

"सर्व सरकारांनी शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे आणि पिकांना किफायतशीर मोबदला मिळेल याची खात्री केली पाहिजे. शेतकरी आणि सरकार यांच्यात नेहमीच संवाद असला पाहिजे."

- एम. वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ठाकरे गट आक्रमक; खासदार संजय देशमुख यांच्या पुतळ्याचे दहन

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

गुलाबी रंग आणि त्यावर मोठी फुलं, रश्मिकाने घातलेल्या ड्रेसची किंमत ऐकून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT