venkaiah naidu
venkaiah naidu sakal
देश

शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण नको: नायडू

सकाळ वृत्तसेवा

गुरुग्राम ः शेतकऱ्यांच्या समस्यांचे मतांसाठी राजकारण करू नये. त्यामुळे देशात विभाजन होईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले.

थोर शेतकरी नेते सर छोटू राम यांच्याविषयीच्या पाच खंडांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, राजकारण केवळ राजकीय क्षेत्रातच व्हावे. सरकारला जाब विचारण्याचा हक्क जनतेला असला तरी नव्या कल्पना स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे.

संपूर्ण देशात एकच बाजारपेठ का असू शकत नाही, असा सवाल करून ते म्हणाले की, आंध्र प्रदेशचा तांदूळ तमिळनाडूत विकला जाऊ शकत नाही हे हास्यास्पद आहे. संपूर्ण देश एकेरी अन्न विभाग असला पाहिजे आणि त्यावर कोणतीही बंधने असू नयेत. शेती शाश्वत आणि किफायतशीर ठरावी म्हणून सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला जावा, असेही नायडू नमूद केले.

"सर्व सरकारांनी शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे आणि पिकांना किफायतशीर मोबदला मिळेल याची खात्री केली पाहिजे. शेतकरी आणि सरकार यांच्यात नेहमीच संवाद असला पाहिजे."

- एम. वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT