Prashant Kishor on congress leadership  esakal
देश

"भाजपाला हरवायचं असेल तर..."; प्रशांत किशोर यांचा राजकीय पक्षांना सल्ला

काँग्रेस हा देशातला दुसरा सर्वात मोठा पक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी देशातल्या निवडणुका जिंकू शकत नाही, असं विधान रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा मधल्या काही काळात सुरू होत्या. मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचं विधान विशेष लक्षवेधी ठरत आहे.

प्रशांत किशोर यांनी सांगितलं की जर एखाद्या पक्षाला भाजपाला हरवायचं असेल तर त्या पक्षाला दुसरी आघाडी म्हणून पुढं यावं लागेल. २०२४ च्या निवडणुकांदरम्यान तिसरी आघाडी म्हणून पुढं येण्यासाठी तुम्ही ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची मदत करत आहात का, याबद्दल विचारलं असता प्रशांत किशोर यांनी उत्तर दिलं.

ते म्हणाले, मला असं कधीच वाटत नाही की तिसरी किंवा चौथी आघाडी या देशात निवडणुका जिंकू शकेल. समजा भाजपा ही पहिली आघाडी आहे. तर तिला हरवण्यासाठी या देशामध्ये दुसरी आघाडी असणं गरजेचं आहे. जर एखाद्या पक्षाला भाजपाला हरवायचं असेल, तर त्याला दुसरी आघाडी म्हणून उदयाला येणं गरजेचं आहे.

काँग्रेस दुसरी आघाडी होऊ शकते का असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. काँग्रेस हा देशातला दुसरा सर्वात मोठा पक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT