coronavirus_1_4.jpg 
देश

कोरोनापासून आता आपल्याला देवच वाचवू शकेल; आरोग्यमंत्र्यांच धक्कादायक वक्तव्य

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

बंगळुरु- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. आता आपल्या राज्याला केवळ देवच वाचवू शकतो असं ते म्हणाले आहेत. राज्यात वाढत असणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या यावरुन त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

‘रिलायन्स’ने ‘५ जी’ तंत्रज्ञानासह केल्या महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसने केली होती. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री बी. श्रीरामलू यांनी कोरोना महामारीतून राज्याला आता देवच वाचवू शकेल असं म्हटलं होतं. मात्र, श्रीरामलू यांनी नंतर यावर स्पष्टीकरण दिलं असून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही, तोपर्यंत देवच आपलं रक्षण करेल असं मी म्हणालो असल्याचं श्रीरामलू म्हणाले आहेत.

मला सांगा कोरोना विषाणूचा प्रचार रोखणे कुणाच्या हातात आहे. फक्त देवच आपणा सर्वांना यातून वाचवू शकतो. लोकांमधील जागरुकता यासाठी महत्वाची आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस राजकारणाच्या खालच्या पातळीला उतरली आहे. असं करणं कुणालाही शोभत नाही, असं श्रीरामलू बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

कर्नाटक काँग्रेस प्रदेश प्रमुख डी.के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच राज्यातील कोरोनाबाधित दिवसेंदिवस वाढत आहेत, असं ते म्हणाले होते. यावेळी काँग्रेसने विशेष करुन श्रीरामलू आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांना लक्ष केलं होतं.

भारतीय 'कोवॅक्सिन'चे मानवी परिक्षण सुरु; नाकाद्वारे दिली जाणार लस
कोरोना विषाणू जगभर पसरत आहे. पुढील दोन महिने आपल्या सगळ्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यात राजकारण आणणे बरोबर नाही. आम्ही निष्काळजीपणा दाखवत आहोत असा विरोधकांचा आरोप साफ खोटा आहे, असंही श्रीरामलू म्हणाले आहेत. 

दरम्यान, कर्नाटकमध्ये आतापर्यंत 47,253 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बुधवारी राज्यात सर्वाधिक 3,174 रुग्ण आढळले. कोरोना विषाणूने आतापर्यंत 928 रुग्णांचा जीव घेतला आहे. शिवाय आतापर्यंत 18,466 लोकांना घरी सोडण्यात आलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT