Pakistan says it has no concern if India diverts water 
देश

आमचे पाणी बंद केल्याने काही फरक पडत नाही: पाक

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः पाकिस्तानात जाणारे आपल्या वाट्याचे पाणी अडविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. परंतु, भारताने आमचे पाणी बंद केल्याने काही फरक पडत नाही, असे पाकिस्तानच्या जल मंत्रालयाचे सचिव ख्वाजा शुमैल यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'सिंधू खोऱ्यातील पाणी करारानुसार सतलज, बियास व रावी या नद्यांचे पाणी भारताने बंद केल्याने पाकिस्तानवर काहीही फरक पडणार नाही. पाकिस्तानी नागिरक पाण्यासाठी दुसऱया मार्गाचा अवलंब करतील, असे शुमैल यांनी म्हटेल आहे.'

दरम्यान, सिंधू खोऱ्यातील भारताच्या वाट्याचे, परंतु पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी जम्मू-काश्‍मीर व पंजाबमधील नद्यांमध्ये वळविण्याचा महत्त्वाचा निर्णय गुरुवारी (ता. 21) केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ट्‌विटद्वारे ही माहिती दिली. रावी, सतलज आणि बियास नद्यांचे पाणी वळविण्यात येणार असून, त्याचा वापर भारतातच करण्यात येणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. रावी नदीवर शाहपूर-कांदी येथे धरण बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलवामानध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. मोस्ट फेव्हर्ड नेशनचा पाकिस्तानला असलेला दर्जाही भारताने रद्द केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आणखी एक पाऊल टाकत पाकिस्तानात जाणारे आपल्या वाट्याचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे.

असे वाचविणार पाणी
सिंधू खोऱ्यातील पाणी करारानुसार सतलज, बियास आणि या नद्यांचे पाणी भारताला मिळणार आहे. तर चिनाब, झेलम आणि सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला मिळणार आहे. सिंधू खोऱ्यात उपलब्ध असलेल्या एकूण 168 दशलक्ष एकर फूट पाण्यापैकी भारताच्या वाट्याला 33 दशलक्ष एकर फूट पाणी येते. हे प्रमाण एकूण पैकी 20 टक्के आहे. भारत आपल्या वाट्याचे 93 ते 94 टक्के पाणी वापरते. उर्वरित पाणी पाकिस्तानात वाहून जात होते. ते पाणी आता इतरत्र वळविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mumbai News: रेल्वेतच महिलेला प्रसुतीकळा, खाकी वर्दीतल्या देवदूताची धाव; माय लेकाचा वाचवला जीव

SCROLL FOR NEXT