Pakistan trusts Indian soldiers 
देश

भारतीय जवानांवर पाकिस्तानला विश्‍वास

‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण; सुचेतगड भागात पाक सैन्य क्वचितच फिरकते

अक्षता पवार

पुणे : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध जगाला माहिती आहेत. दोन्ही देशातील सैन्य आपापल्या सीमारेषेवर संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. अशात एक गोष्ट थक्क करणारी ठरते ती म्हणजेच भारतीय जवानांवर पाकिस्तान सैन्याचा असलेला विश्‍वास... ही बाब आश्‍चर्यचकित करणारी आहे. जम्मू येथील सुचेतगड या सीमा भागात भारतीय हद्दीत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. पाकिस्तान सैन्य या भागात क्वचितच फिरकते. याचे कारण म्हणजे आपल्याला भारतीय जवानांकडून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची मानसिकता पाकिस्तानच्या सैन्यामध्ये असल्याचे ‘बीएसएफ’च्या एका अधिकाऱ्याने नमूद केले.

सुचेतगड येथील भारत-पाक सीमेवर दोन्ही देशांची चौकी असून दोन्ही देशातील सर्व प्रकारचे पत्र व्यवहार या पोस्टद्वारे केले जातात. पाकिस्तानचे सियालकोट सुचेतगडापासून ११ किलोमीटरवर आहे. पाकिस्तान याला सीमा भाग म्हणून जाहीर करत नसला, तरी भारताने यास आंतरराष्ट्रीय सीमेचा दर्जा देत सुरक्षेच्या अनुषंगाने येथे कुंपण घातले आहेत. या भागातील स्थानिक शेती व्यवसाय करत असून त्यांच्या उत्पन्नाचा हा एकमेव पर्याय आहे.

अनेकांच्या शेती व नातेवाईक सीमेच्या पलिकडे असल्याने सीमेपलिकडे ये-जा करण्यासाठी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवत नाही. यासाठी बीएसएफ नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबर त्यांना सहकार्यही करत आहे. शेतीसह सण-सोहळ्यादरम्यान नातेवाइकांच्या भेटीगाठी, मिठाई आदींचे आदान-प्रदान येथून होते. त्यामुळे अत्यंत सकारात्मक चित्र येथे पाहायला मिळते. असे असले तरी देशाची सुरक्षा पाहता सैन्य आणि बीएसएफ डोळ्यात तेल ओतून संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

दोन्ही देशांना सावलीचा आसरा...

सुचेतगड येथील सीमारेषा पाहता, या ठिकाणी भारताने खांब रोवून आपली हद्द निश्‍चित केली आहे. या खांबावर काही आकडे टाकले असून झिरो पॉइंटवर असलेल्या दोन्ही देशांच्या पोस्ट दरम्यानच्या हद्दीवर असलेल्या ९१८ या क्रमांकाचा खांब आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. दोन देशांची विभागणी करणाऱ्या या खांबालाच एका पिंपळाच्या झाडाने सामावून घेतले आहे. जणू ही सीमाच या वृक्षाला मान्य नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा भेद न करता हे झाड दोन्ही देशांना समान सावली देते.

रेल्वे सेवा केली बंद

सुचेतगड येथे पूर्वी रेल्वे मार्ग होता. या मार्गावरून भारत ते पाकिस्तान दरम्यानचा प्रवास होत होता. ‘जम्मू-सियालकोट लाइन’ म्हणून या रेल्वे मार्गाची ओळख होती. सियालकोटमार्गे वजीराबाद जंक्शन ते जम्मू असा हा सुमारे ४३ किलोमीटरपर्यंतचा प्रवास. महाराजा रणबीर सिंह यांच्या पुढाकाराने १८९० मध्ये हा रेल्वे मार्ग तयार केला होता. परंतु स्वातंत्र्यानंतर सप्टेंबर १९४७ ला हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT