Panchjanya Amritmahotsav Yogi Adityanath statement Uttar Pradesh no 1 economy in country sakal
देश

पांचजन्य अमृतमहोत्सव; उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था; योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने अत्यंत वेगाने अग्रेसर असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

मंगेश वैशंपायन : सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने अत्यंत वेगाने अग्रेसर असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. संघाच्या पांचजन्य मुखपत्राच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ यांनी हा दावा केला. त्याचबरोबर काशी विश्वनाथ, विंध्यवासिनी धाम आदी ७०० धार्मिक स्थळांच्या ‘जीर्वोध्दारा‘ची योजनाही वेगाने सुरू आहे असेही सूचक विधान आदित्यनाथ यांनी केले. यानिमित्त झालेल्या माध्यम महासंमेलनात आदित्यनाथ यांनी व्हर्चयुअल माध्यमातून संबोथित केले.

मनोहरलाल खट्टर (हरियाणा) हेमंत विस्वा सरमा (आसाम), प्रमोद सावंत (गोवा), जयराम ठाकूर (हिमाचल प्रदेश), पुष्कर धामी (उत्तराखंड) आदी मुख्यमंत्र्यांनही संमेलनाला हजेरी लावली. पांचजन्यचे संपादक हितेश शंकर, आॅर्गनायजरचे संपादक प्रफुल्ल केतकर , खासदार रमेश बिधुडी, डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आदी उपस्थित होते. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी संपादकपद भूषविलेल्या पांचजन्यशी आपले विद्यार्थी दशेपासून घट्ट नाते असल्याचे सांगून आदित्यनाथ म्हणाले की भारताच्यया संस्कृती व सभ्यतेवर होणारा प्रत्येक हल्ला परतवून लावण्यासाठी पांचजन्यने कायम सकारात्मक उर्जा दिली आहे.

उत्तर प्रदेशात २०१२ ते २०१७ पासून ७०० हून जास्त दंगली झाल्या पण गेल्या ६ वर्षांत एकही दंगल झाली नाही. ‘डबल इंजिन'सरकारच्या कामकाजामुळे गेल्या ७० वर्षांत राज्यात गुंतवणुक झालेली आहे. या सरकारने चार डझनांहून जास्त विकास योजना मार्गी लावल्या आहेत. सर्वाधिक एक्र्पेस वे असलेले, प्रती व्यक्ती उत्पन्न दुपटीने वाढलेले, पाच पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले उत्तर प्रदेश आर्थिक बाबतीतही देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. मुख्यमंत्री तीर्थस्थळ विकास योजनेत काशी विश्‍वनाथ, ब्रज तीर्थ विकास, देवी विंध्‍यवासिनी ग्राम, नमामि गंगे परियोजना आदींच्या माध्यमातून ७०० हून जास्त तीर्थक्षेत्रांचा जीर्णोध्दार करण्याचे काम वेगाने सुरू आहे असेही आदित्यनाथ म्हणाले.

निवेदिता वैशंपायन यांना राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार

पांचजन्यच्या नावाने यंदापासून राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सुरू करण्यात आले त्यांचेही वितरण यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येकी ५१ व ७५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. सर्वोत्तम प्रादेशिक पत्रकारितेचा पुरस्कार मराठीसाठी दिल्लीतील मुक्त पत्रकार निवेदिता मदाने-वैशंपायन यांना मिळाला. याशिवाय सर्वश्री आनंद रंगनाथन, अशोक श्रीवास्तव, निमिष व रिशांत राघव, स्वाती गोयल शर्मा, बालेंदू दधीच, रवीश तिवारी आदींनाही विविध श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT