Mansukh Mandaviya google
देश

देशात ऑक्सिजनअभावी किती जणांचा मृत्यू? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोना काळात ऑक्जिनच्या कमतरतेमुळे मृत्यू (Oxygen Shortage Deaths) झालेल्यांचा आकडा राज्यांना मागविला होता. मात्र, फक्त १९ राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही समावेश नसून महाराष्ट्राने अद्याप आकडेवारी दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत दिली. कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किती जणांचा मृत्यू झाला? असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

देशात किती जणांचा मृत्यू?

देशात ऑक्सिनच्या कमरतेमुळे किती जणांचा मृत्यू झाला याबाबतची माहिती सर्व राज्यांना पत्र लिहून मागवली होती. त्याला १९ राज्यांनी प्रतिदास दिला. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, तेलंगणा, आसाम, पंजाब, उत्तराखंड, त्रिपुरा, दादरा नगर हवेली, दीव-दमण, अंदमान, निकोबार, ओडिशा, जम्मू-काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, पाँडीचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, झारखंड, हिमाचल प्रदेश हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तसेच पंजाबने चार रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची माहिती लेखी स्वरुपात दिली आहे, असं मनसुख मांडविया यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा डेटा देण्याबाबत सांगितले होते. तरीही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्रानेही याबाबत माहिती दिली नाही. या मुद्द्यावरून आधी देखील राजकारण सुरू होतं. दुर्दैवाने आताही हे राजकारण सुरू आहे. हा राजकारणाचा विषय नाही, असं मनसुख मांडविया म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT