Pay the arrears of Coal India, power generating companies Pay the arrears of Coal India, power generating companies
देश

केंद्राचे महाराष्ट्रासह सहा राज्यांना पत्र; थकबाकीवरून दिला इशारा

सकाळ डिजिटल टीम

कोल इंडिया आणि वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या वाढत्या थकबाकीबाबत (power generating companies) केंद्र सरकारने (Centre) राज्य सरकारांना इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या वतीने ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारांना स्वतंत्र पत्र पाठवले आहे. ऊर्जा सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना राज्य युटिलिटीला वीज कंपन्या आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी भरण्यास सांगितले आहे. (Centres letter to six states including Maharashtra)

थकबाकी (arrear) न भरल्याने वीजनिर्मितीमध्ये पुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे. यामुळे या क्षेत्रातील नवीन गुंतवणुकीवरही परिणाम होत आहे. या सर्व राज्यांकडे वीज कंपन्या आणि कोल इंडियाची (Coal India) कोट्यवधींची थकबाकी आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. थकबाकी न भरल्या राज्यांतील वीज पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

उत्तर प्रदेश वीज कंपन्यांचे ९,३७२.४९ कोटी आणि कोल इंडियाचे ३१९.८२ कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच तामिळनाडूचे २०,८४२.५३ कोटी आणि ७२९.६० कोटी, महाराष्ट्राचे १८,०१४.५४ कोटी आणि २५७३.१९ कोटी, राजस्थानचे ११,१७६.३८ कोटी आणि ३०७.८६ कोटी, मध्य प्रदेशचे ५,०३०.१९ कोटी आणि २५६.०४ कोटी आणि जम्मू आणि काश्मिरचे ७,२७५.१२ कोटी थकबाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT