india-china 
देश

सीमेवर शांतता प्रस्थापित करा; भारताने चीनला सुनावले

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सीमाभागातील शांतता आणि सलोखा हाच भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांचा आधार असल्याने तणाव कमी करणारी जबाबदार कृती चीनकडून अपेक्षित आहे, अशा इशारेवजा आवाहनातून भारताने चीनला सुनावले आहे. पॅंगाॅग सरोवर परिसरातील फिंगर क्षेत्रातून माघार घेण्याबाबत चीनच्या आडमुठ्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या कृतीगटाच्या (डब्ल्यूएमसीसी) बैठकीआधी भारताने हा इशारा दिला आहे. 

भारत आणि चीनदरम्यान लवकरच ‘डब्ल्यूएमसीसी’ची बैठक होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज सांगितले. ताबारेषेवरील यथास्थितीमध्ये एकतर्फी बदलाचा कोणताही प्रयत्न मान्य केला जाणार नाही, ही भारताची भूमिका स्पष्ट करताना अनुराग श्रीवास्तव यांनी चीनला दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींच्या चर्चेमधील सैन्य माघारीच्या सहमतीचीही आठवण करून दिली. 

साप्ताहिक वार्तालापादरम्यान श्रीवास्तव यांनी सांगितले, की ताबारेषेला उभयमान्यता हा सीमाभागातील शांतता आणि सामंजस्याचा आधार आहे. १९९३ पासून भारत आणि चीनमध्ये झालेले अनेक करारही यावरच आधारीत आहेत. असे असताना चिनी सैन्याने या करारांना हरताळ फासताना भारतीय भूभागावर बिनबुडाचा आणि अवास्तव दावा सांगितला असून मोठ्या प्रमाणात सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत. ताबारेषेच्या आदरासाठी भारत कटिबद्ध आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्ण सैन्य माघारीचे उद्दिष्ट 
ताबारेषेवरून दोन्ही बाजूंच्या सैन्य तुकड्यांनी पूर्णपणे माघार घेणे आणि भारत चीन सीमेवर शांतता व सलोखा प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये आधीच सहमती झाली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजनैतिक तसेच लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर दोन्ही देशांची बोलणीही सुरू आहेत. वरिष्ठ कमांडर पातळीवरील चौथ्या टप्प्यातील चर्चा १४ जुलैला झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सीमावादावरील उभय देशांच्या कृती गटाची (डब्ल्यूएमसीसी) बैठक लवकरच होईल, असेही अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT