देश

लोकांच्या हाताला काम; लॉकडाउन शिथिल झाल्याचा परिणाम 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जाऊ लागला असून याचे परिणाम अर्थचक्रावर देखील होताना दिसत आहेत. अनेक राज्यांमध्ये उद्योग सुरू झाले असून कामगार देखील कामावर परतले आहेत.

मनरेगाची काही कामे सुरू झाल्याने ग्रामीण भागांतील लोकांना मोठा आधार मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अर्थचक्र गतिमान झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. दिल्ली, बिहार, झारखंडमध्ये रोजगाराच्या बाबतीत बरीच सुधारणा झाल्याचे उद्योग संघटनांचे म्हणणे आहे. उत्तराखंड, आसाम आणि ओडिशातील स्थितीमध्येही सुधारणा झाल्याचे दिसून येते. 

लॉकडाउनमुळे लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार गमवावा लागल्याने केंद्र सरकारने त्यांना आधार देण्यासाठी असंख्य नव्या योजनांची घोषणा केली होती. राज्यस्तरावर ग्राम विकास, जल संसाधन, वने आणि पर्यावरण, रस्ते उभारणी यासारख्या कामांना वेग देण्यात आला असून या माध्यमातून आठ लाख एवढ्या रोजगारांची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ मनरेगाच्या माध्यमातून दहा लाखांपेक्षाह अधिक लोकांना रोजगार देण्यात आला असून कृषीक्षेत्रालाही अनुदानाचा मोठा आधार मिळाला आहे. मे महिन्यात देशात २.१ कोटी रोजगाराची निर्मिती झाली असून हे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे देशातील बहुतांश मोठे उद्योग बंद असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आठवडाभर मुसळधार! ४ एप्रिलपर्यंत हवामान विभागानं दिला धोक्याचा इशारा

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात खरे मित्र; कधीच कुणाला देत नाहीत धोका, आयुष्यभर जपतात माणसं

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT