Maharashtra Weather Alert
esakal
शेतकऱ्यांसाठी पुढचे काही दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाने ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात जोरदार वारे आणि विजा पडण्याचा धोका असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.