narendra modi
narendra modi 
देश

'महाराष्ट्रातून मजूरांना घरी पाठवल्याने कोरोना पसरला, याला काँग्रेस जबाबदार'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण केलंय. मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटलंय की, या देशाचं दुर्भाग्य असाय की, अनेक जण असे आहेत की ज्यांचा काटा 2014 तच अडकला असून त्यातून ते बाहेरच पडू शकत नाहीये. ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला आहे. त्यांना देशाच्या जनतेनं पुरतं ओळखलं आहे. पन्नास वर्षापर्यंत तुम्हीही इथे बसण्याची संधी मिळाली होती.

पुढे त्यांनी देशात कोरोना पसरवण्याचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. त्यांनी टीका करताना त्यांनी म्हटलंय की, पहिल्या लाटेत काँग्रेसने हद्द केली. देश लॉकडाऊनचे पालन करत होता. जागतिक आरोग्य संघटना सगळ्यांना सल्ले देत होती. जे जिथे आहेत, त्यांनी तिथेंच थांबावं, असा संदेश दिला जात होता. तेंव्हा काँग्रेसवाल्यांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर श्रमिकांना मोफत तिकीट दिलं. आणि लोकांना प्रेरित केलं की जा आणि महाराष्ट्रातील आपलं ओझं कमी व्हावं, जा तुम्ही यूपी, बिहारचे आहात.. जा असं म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, काँग्रेसनेच आफरातफरीचं वातावरण बनवलं. तुम्ही आमच्या श्रमिकांना अनेक अडचणीमध्ये ढकललं. त्यावेळी दिल्लीत असं सरकार होतं त्यांनी जीपवर माईक बांधून दिल्लीत झोपडीत सांगितलं की गावी जा... संकट मोठं आहे. आणि श्रमिकांसमोर अडचणी वाढवल्या. त्या कारणास्तवच कोरोनाचा वेग वाढला. एकीकडे देश मोठ्या संकटाशी दोन हात करत असताना तुम्ही असं वागत होता. काय हा देश तुमचा नाही? त्यांच्या अडचणी तुमच्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

पुढे त्यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटलं की, तुम्ही लोकांना मास्क घाला, अंतर राखा म्हटलं असतं तर त्यातून भाजपला आणि मोदींना काय फायदा झाला असता? एवढ्या मोठ्या संकटातही हे पवित्र काम हे करु शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाला लागली आग, तब्बल ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच

Lok Sabha Election: '...तर ४०० जागा आल्यास ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर उभारले जाईल', मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

IPL 2024 Playoff Race : दिल्लीच्या विजयाने प्लेऑफचे बदलले समीकरण! लखनौचा खेळ खल्लास... 3 मध्ये चुरशीची लढत...

Loksabha Election : हरियाना काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली ; परिस्थिती अनुकूल, तरीही कुरघोडीचे राजकारण रंगले

Punjabi Aloo Paratha : नाश्त्याला बनवा पंजाबी स्टाईल बटाट्याचा पराठा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT