देश

Independence Day : मोदींनी आज भाषणाचा विक्रम केला असता पण..

वृत्तसंस्था

स्वातंत्र्यदिन
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत एकूण 93 मिनिटांचं भाषण केलं. त्यांच्या इतर भाषणांच्या तुलनेत हे दुसऱ्या क्रमांकाचे जास्त काळ चाललेले भाषण होते. यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये 94 मिनिटांचं भाषण केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी सर्वाधिक वेळ भाषण देण्याचा रेकॉर्ड माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावे होता. त्यांनी 1947 मध्ये त्यांनी 72 मिनिटे भाषण देत देशाला संबोधित केलं होतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 15 ऑगस्टला त्यांच्या कार्यकाळा दरम्यान सरासरी 30 ते 35 मिनिटे भाषण केलं होतं. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरासरी 30 ते 35 मिनिटांचे भाषण केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2014 मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांचं भाषण 65 मिनिटे सुरू होतं. त्यानंतर 2015 मध्ये 86 मिनिटे, 2017 मध्ये 56 मिनिटे आणि 2018 मध्ये 65 मिनिटे त्यांनी देशाला संबोधित केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT