chidambaram
chidambaram 
देश

Loksabha 2019 : 'यूपीए-3' हेच भविष्यातील वास्तव : चिदंबरम 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली  : "केंद्रातील मोदी सरकारची पाच वर्षे ही आपत्ती होती. पुढील सरकार बनविणे भाजपला शक्‍य नसून "यूपीए-3' हेच भविष्यातील वास्तव आहे,' असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज केला. 

"पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. "दक्षिणेकडील आणि पश्‍चिमेकडील राज्यांमध्ये भाजपची ध्रुवीकरणाची मोहीम पूर्णपणे फसली आहे. उर्वरित राज्यांमध्येही असेच होईल. भाजपच्या या फसलेल्या धोरणांमुळे ते केंद्रात पुन्हा सरकार बनवू शकणार नाहीत. त्यामुळेच कॉंग्रेस आणि मित्रपक्ष हाच एकमेव पर्याय असेल. "यूपीए-3' हे वास्तव असेल,'' असे चिदंबरम म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाच्या आर्थिक विकासाची गती मंद झाल्याचे सिद्ध झाले असून, गेल्या 45 वर्षांत नव्हती इतकी बेरोजगारी वाढली आहे, असा दावा चिदंबरम यांनी केला. आर्थिक आणि राजकीय आघाडीवर अपयशी ठरलेल्या भाजपमुळे सामाजिक सलोख्यालाही तडा गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने धर्माविरोधात धर्म आणि जातीविरोधात जाती, असे चित्र निर्माण केल्याने देशाचे नुकसान झाले, असे चिदंबरम म्हणाले. 

केंद्रातील मोदी सरकारची पाच वर्षे ही आपत्ती होती. पुढील सरकार बनविणे भाजपला शक्‍य नसून "यूपीए-3' हेच भविष्यातील वास्तव असेल. भाजपची ध्रुवीकरणाची मोहीमही साफ फसली आहे. 
- पी. चिदंबरम, कॉंग्रेस नेते 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT