narendra modi 
देश

शीखांच्या मनात गैरसमज पसरवला जातोय; पंतप्रधान मोदींचा आरोप

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना टोमणेही मारले. पंजाबमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी शीखांच्या मनात गैरजमज भरवला जात असल्याचा आरोप केला आहे. देश प्रत्येक शीखांचा आदर करतो. मला पंजाबची रोटी खायला मिळाली आहे. मी भाग्यवान आहे. पण काही लोक त्यांची दिशाभूल करत आहेत, ते योग्य नाही, असं मोदी म्हणाले. 

ओपन चँलेज; 'हिंमत असेल तर मी खलिस्तानी नाही हे एकदा म्हणून दाखव' 

पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच देशात सध्या आंदोलन करण्याची फॅशन आली असल्याचं ते म्हणाले आहेत. सध्या देशात एक नव्या प्रकारची जमात तयार होत आहे. हे आंदोलनजीवी जमात असून आंदोलन केल्याशिवाय जगूच शकत नाही. वकीलांचं , विद्यार्थ्यांचं कुणाचं ही आंदोलन असो हे तिथंच असतात. हे आंदोलनजीवी लोकांना ओळखायला हवं. देश आंदोलनजीवी लोकांपासून वाचो. हे सगळे आंदोलनजीवी परजीवी असतात, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी बोचरी टीका केली.

पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. काही लोक जाणूनबुजून कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. शेतकरी कायद्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी आता यू-टर्न घेतला आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.  

उत्तराखंड आपत्ती : जाणून घ्या महत्त्वाचे 10 अपडेट्स 

फॉरेन डिस्ट्रक्टीव्ह आयडॉलॉजी पासून वाचायला हवं. यासाठी आपल्याला जागृत रहायला हवं, असं म्हणत मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर भाष्य केलं. विरोधक कोणत्याही मुद्द्यांवर विरोध करत आहे. विरोध करण्यात काही गैर नाही, पण देशाला तोडणाऱ्या मुद्द्यांविरोधात तरी त्यांनी एकजूट राहायला हवं, असं ते म्हणाले. आपल्या देशाच्या विकासासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेचं एक मूल्य आहे. आत्मनिर्भर भारताच हा महत्वपूर्ण स्तंभ आहे. गाव आणि शहरातील दरी कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारत आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT