farmer protest
farmer protest sakal
देश

PM मोदी शेतकऱ्यांचा सन्मान करतात, चर्चेस तयार: भाजप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला दिल्ली- एनसीआर, पंजाब आणि हरियानामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.पंजाबमध्ये रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तसेच व्यापारपेठा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. अमृतसर, रूपनगर, जालंधर, पठाणकोट, संग्रूर, मोहाली, लुधियाना, फिरोजपूर, भटिंडा येथे आंदोलनाची तीव्रता अधिक होती. हरियानामध्ये या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्था, दुकाने आणि मंडी बंद ठेवण्यात आल्या होत्या. आंदोलकांनी सिरसा, फतेहबाद, कुरूक्षेत्र, पानिपत, हिसार, चरखी दादरी, कर्नाल, कैथल, रोहतक, झज्जर आणि पंचकुला या जिल्ह्यांमध्ये जोरदार आंदोलन केले. या दोन्ही राज्यांची राजधानी असणाऱ्या चंडीगडमध्ये बंदला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही.

२५ गाड्या रद्द

पंजाब आणि हरियानामध्ये आपत्कालीन सेवा वगळता सर्व काही बंद होते. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणांवर ट्रॅक्टर रॅली काढल्याने सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. अनेक ठिकाणांवर शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावरच ठिय्या दिला होता. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. या आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींच्यावेळांमध्ये बदल करण्यात आले असल्याचे रेल्वेचे फिरोझपूर विभागीय व्यवस्थापक सीमा शर्मा यांनी सांगितले. विविध ठिकाणांवरील तब्बल २५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

आजच्या भारत बंदवर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सांबित पात्रा यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच शेतकऱ्यांचा आदर केला आहे आणि त्यांचा उल्लेख ते नेहमी 'अन्नदाता' म्हणून करतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारने नेहमीच ऐतिहासिक असे निर्णय घेतले आहेत. मग ते MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय असो वा विमा योजना असो वा पीक खरेदीच्या दृष्टीने घेतलेले निर्णय असोत. दुर्दैवाने आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही पक्ष हे करत आहेत. भारत हे सगळं पाहत आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हे आधीच स्पष्ट केलंय की, सरकार हे नेहमीच चर्चेसाठी तयार आहे. आपल्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत हा मुद्दा चर्चेद्वारे सोडवला पाहिजे.

हे आंदोलन दहा वर्षे चालवू

आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी पुन्हा चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी आज पुन्हा केले. यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी हे सरकार कारस्थानी व अहंकारी असल्याचा हल्लाबोल केला. आम्ही हे आंदोलन पुढची १० वर्षे चालविण्यास तयार आहोत असेही ते म्हणाले. आतापर्यंत केंद्र आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या बारा फेऱ्या पार पडल्या असून आंदोलनावर मात्र तोडगा निघू शकलेला नाही. या आंदोलनामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत माध्यमांनी विचारले असता टिकैत म्हणाले की, आम्ही नागरिकांना आज सुटी घ्या व घरात बसा असे आवाहन केले होते. नागरिकांना दुपारनंतर बाहेर पडण्याचेही आवाहन केले होते. आम्हाला सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढाव्यात असे वाटत नाही. आम्ही काही ठप्प करू इच्छित नाही. केवळ या सरकारला संदेश देऊ इच्छितो. शेतकरी हाही नागरिकच आहे. मात्र हे सरकार अहंकारी व कारस्थानी आहे. ते शेतकऱ्यांविरुद्ध सूड घेण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहे. चर्चा करण्यास शेतकरी संघटनांनी कधीही नाही म्हटले नाही. मात्र सरकारकडून विना अट चर्चेचा प्रस्ताव येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT