politics of polarization must be stopped Sitaram Yechury sakal
देश

ध्रुवीकरणाचे राजकारण रोखावे लागेल : सीताराम येचुरी

हिंदुत्वाच्या जातीयवादी धार्मिक अजेंड्याला थेट शह देण्याची वेळ आली असून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न प्रत्येक पातळीवर हाणून पाडावा लागेल.

सकाळ वृत्तसेवा

कन्नूर : हिंदुत्वाच्या जातीयवादी धार्मिक अजेंड्याला थेट शह देण्याची वेळ आली असून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न प्रत्येक पातळीवर हाणून पाडावा लागेल. डाव्या पक्षांसमोर सध्या हिंदीभाषक राज्यामध्ये जातीय- धार्मिक ध्रुवीकरणाचे फार मोठे आव्हान उभे ठाकले असल्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मांडले आहे.

‘माकप’च्या सरचिटणीसपदी येचुरी यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली असून त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे मत मांडले. उत्तरेप्रमाणेच ईशान्येकडील राज्यांमध्ये झपाट्याने हे धार्मिक आणि जातीयवादाचे विष भिनू लागले असून याचे भविष्यामध्ये गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचे भीतीही त्यांनी व्यक्त केली.

नको असलेले मुद्दे चर्चेत

ध्रुवीकरणाच्या राजकारणामध्ये लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न बाजूला पडत असल्याची खंत व्यक्त करतानाच येचुरी यांनी हिजाब, हलाल आणि अजान हे नको असलेले मुद्दे चर्चेमध्ये येत असल्याची खंत व्यक्त केली. वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांवर कुणीच बोलत नाही. इंधानाच्या किमतीही आकाशाला भिडल्या आहेत. हे सगळेच मुद्दे ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे अडगळीत पडले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT