pranab mukhrjee pm modi 
देश

विरोधकांचा सूर ऐका, संसदेतही येत चला; प्रणवदांच्या अखेरच्या पुस्तकात मोदींना सल्ला

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, पहिल्या कारकीर्दीत मोदींची शैली एकाधिकारशाहीची होती. तसेच, मोदी सरकार पहिल्या कार्यकाळात संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवू शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतभेदाचा सूर देखील ऐकला पाहिजे. तसेच संसदेत वारंवार येऊन बोललं पाहिजे. संसदेचा वापर विरोधकांशी बोलण्यासाठी तसेच देशाला जागृत करण्यासाठी म्हणून केला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. प्रणब मुखर्जी यांनी आपले पुस्तक ‘द प्रेसिडेंसियल ईयर्स, 2012-2017' मध्ये यांवर मते मांडली आहेत. त्यांनी हे पुस्तक आपल्या निधनाच्या आधी एक वर्ष लिहलं होतं. रुपा प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले हे पुस्तक मंगळवारी बाजारात उपलब्ध झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रणबदांची भेट घेतली होती. मोदी यांनी निर्णय घेण्यापूर्वी आपल्याशी चर्चा केली नाही. देशाला उद्देशून भाषण केल्यानंतर ते राष्ट्रपती भवनात मला भेटायला आले. काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचाराचा मुकाबला करणे, दहशतवाद्यांचा निधी रोखणे असे तीन उद्देश त्यांनी या निर्णयामागचे कारण म्हणून सांगितले. माजी अर्थमंत्री या नात्याने या निर्णयाला त्यांनी माझा पाठिंबा मागितला होता पण नंतर आपण पाठिंबा देणारे निवेदन तत्त्वत: जारी केलं, असं त्यांनी म्हटलं पण निश्चलनीकरणाने अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत असेही म्हटले होतं. आणि नंतर चार वर्षांनीही त्यातील कुठलेच परिणाम साध्य झालेले दिसले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी पुढे म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतभेदाचा सूर देखील ऐकला पाहिजे. तसेच संसदेत वारंवार येऊन बोललं पाहिजे. संसदेचा वापर विरोधकांशी बोलण्यासाठी तसेच देशाला जागृत करण्यासाठी म्हणून केला पाहिजे. प्रणब मुखर्जींच्या मते संसदेत पंतप्रधानांच्या उपस्थितीने देखील या संस्थेच्या कामकाजावर खूप फरक पडतो. 

या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की, 'मग ते जवाहरलाल नेहरु असोत, इंदिरा गांधी असो, अटल बिहारी वाजपेयी असो वा मनमोहन सिंह असोत, या सर्वांनी संसदेत आपली उपस्थिती अधोरखित केली.' प्रणब मुकर्जी यांनी म्हटलंय की, आपला दुसरा कार्यकाळ सांभाळणाऱ्या मोदींनी आपल्या माजी पंतप्रधानांपासून प्रेरणा घ्यायला हवी. तसेच संसदेतील आपली उपस्थिती वाढवून एक उठून दिसणारे नेतृत्व द्यायला हवे. जेणेकरुन त्यांच्या पहिल्या कार्यकाळात उद्भवलेली संसदीय संकटाची परिस्थिती टाळता येईल.
त्यांनी पुढे म्हटलंय की, संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात ते विरोधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तसेच यूपीएच्या वरिष्ठ नेत्यांशी सतत संपर्कात राहिले आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवयाचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT