देश

शरद पवार-प्रशांत किशोर पुन्हा भेटले; 12 दिवसांतील तिसरी भेट

नामदेव कुंभार

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रीय झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवास्थानावर झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु आहेत. यातच आज, बुधवारी व्यूहरचनाकार प्रशांतकिशोर यांनी शरद पवार यांच्या निवास्थानावर जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मागील 48 तासांतील दुसरी तर 12 दिवसांतील तिसरी भेट आहे. दोघांच्या सततच्या भेटीमागे नेमकं कारण काय? अद्याप गुलदस्त्यातच आहे.

प्रशांतकिशोर आणि शरद पवार या दोघांची पहिली भेट मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर झाली होती. त्यानंतर दोन्ही भेटी दिल्लीत झाल्या आहेत. यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दोन्हीही नेत्याकडून तिसऱ्या आघाडीचा विषय हा अजेंड्यावर नसल्याचं सांगतलं जात आहे. मात्र, तरीदेखील या दोघांमध्ये गाठी-भेटीचं सत्र सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटी नेमक्या कशासाठी अशी चर्चा सध्या सुरु आहे.

तिसऱ्या आघाडीवर विश्वास नाही - प्रशांतकिशोर

‘माझा तिसरा किंवा चौथ्या आघाडीवर विश्‍वास नाही कारण या आघाड्या भाजपला आव्हान देऊ शकतील असे वाटत नाही. कारण, अशा आघाडीची अनेकदा चाचपणी करण्यात आलेली आहे. हा फार जुना प्रयोग आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तो फारसा प्रभावी ठरणार नाही’

विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे का?

२२ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील सर्वाधिक अनुभवी नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी 'राष्ट्रमंच'ची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचा कोणताही नेता उपस्थित नव्हता, त्यामुळे काँग्रेसला बाजून ठेवून विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे का? अशा चर्चांना सुरुवात झाली. त्यात शरद पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांची दोनदा भेट घेतली होती. त्यामुळे तर या चर्चांना अधिक उधाण आले होते. पण, 'राष्ट्रमंचची बैठक राजकीय स्वरूपाची नव्हती. ही बैठक भाजपविरोधात अन्य राजकीय पक्षांची आघाडी करण्याचा तसेच काँग्रेसला एकाकी पाडण्याचा प्रयत्न मानणेही चूक ठरेल', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजीद मेमन यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे महत्व काय?

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस प्रणित यूपीएचा एक भाग आहे. शिवाय महाराष्ट्रात एनसीपी शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेत आहे. असे असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते स्वबळाचा नारा देत आहेत. दुसरीकडे, २०२४ च्या निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उपस्थित करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांच्या निवास्थानी झालेली 'राष्ट्रमंच'ची बैठक काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी इशारा होता. २०१८ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रमंचच्या याआधी अधूनमधून बैठका व्हायच्या. पण, राष्ट्रमंचला पुन्हा सक्रिय करण्यात आलं आहे. राष्ट्रमंचचा एक ढाल म्हणून वापर करायचा, जेणेकरुन नवी योजना अंमलात आली नाही तर त्याचं खापर कुणावर फुटणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT