President Ramnath Kovind Speech before budget session  
देश

रामजन्मभूमी निर्णयावेळी भारतीयांनी परिपक्वता दाखवली : राष्ट्रपती 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता. 31) सुरू झाले. उद्या (ता. 1) अर्थसंकल्प सादर केला जाईल, त्यापूर्वी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल. त्यापूर्वी अधिवेशन सुरू होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केले. त्यांनी सरकाराच्या सर्व कामांचा आढावा घेतला. तसेच नव्या कायद्यांचे स्वागत करत येत्या दशकात भारताला नव्या उर्जेने गती देऊ असे आश्वासन दिले. 

येणारं दशकं हे भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी संविधानाला 70 वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं आहे. नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी हे सरकार कायमच प्रयत्नशील राहील. 'सबका साथ सबका विकास' हा या सरकारचा मंत्र आहे, त्यामुळे आणखी विधायक कामं या सरकारकडून होतील. तसेच भारताच्या निर्मितीसाठी जनादेश अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही कोविंद यांनी यावेळी सांगितले. 

मागील वर्षातील सर्वात महत्त्वाचे निर्णय म्हणजे जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे आणि रामजन्मभूमीचा निर्णय. कलम 370 हटविणे ऐतिहासिक पाऊल होते. तसेच जम्मू काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे ते मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. रामजन्मभूमीच्या निर्णयावेळी भारतीयांनी परिपक्वता दाखवली. चर्चा, वादविवाद लोकशाहीला आणखी सशक्त बनवतो, त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे, असेही कोविंद यांनी अभिभाषणावेळी सांगितले. 

तीन तलाक कायदा, चीटफंड संशोधन कायदा, मोटरवाहन संशोशन कायदा असे महत्त्वाचे कायदे या सरकारने पारित केले. कर्तारपूर साहीब कॉरिडॉर खुला करणे, 8 कोटी नागरिकांना गॅसजोडणी देण्यात आली, 24 कोटी नागरिकांना विमा सुरक्षा देण्यात आली अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचे राष्ट्रपतींनी स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी सरकारला शुभेच्छा दिल्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Latest Marathi News Live Update : २४ तासांच्या आत पुणे शहरात दोन गोळीबाराच्या घटना

SCROLL FOR NEXT