देश

राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे मोदींची 'मन की बात' : सप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेले अभिभाषण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' असल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टीका केली आहे. तर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "आज सर्व जण कॅशलेस झाले आहेत. मोदींनी "सबका पैसा, सरकार का विकास' हे ध्येय साध्य केल्याने आज ते आनंदात असतील. आता ते विधान बदलत आहेत. 31 डिसेंबरच्या भाषणानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती चार वेळा वाढल्या आहेत. जर याला विकास म्हणत असतील, आम्ही प्रभावित झालो आहोत', अशी टीका चौधरी यांनी केली.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'सरकारने रोजगारनिर्मितीसाठी काहीही केलेले नाही. माझ्यामते, हे सरकार रोजगारनिर्मितीमध्ये संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.' शिवाय काँग्रेस नेते अहमद पटेल आणि सीपीआयचे नेते डी राजा यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT