देश

Article 370 : काश्मीरमध्ये उद्योग उभारण्यास प्राधान्य : पंतप्रधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काश्मीरमधील जनता आता नव्या विश्वासाने पुढे जाईल. येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग उभारणीस प्राधान्य दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, की आता काश्मीरमधील युवकच येथील विकासाची दोरी आपल्या हातात घेतील. देशातील सर्वांत प्रगत राज्य बनण्याची क्षमता येथे आहे. प्रशासनात हवा असलेला बदल येथे केला जात आहे. बॉलिवूडची चित्रीकरणाची काश्मीर ही पसंती होती. पण, आता मोजक्याच चित्रपटांचे चित्रीकरण येथे केले जाते. आता या निर्णयामुळे येथील वातावरण पुन्हा बदलणार आहे. त्यामुळे माझे आवाहन आहे, की हिंदीसह भारतातील व परदेशातील चित्रपटसृष्टीने काश्मीरमध्ये यावे. काश्मीरमध्ये तंत्रज्ञानाचा विस्तार केला जाईल, याकडे लक्ष देवू. तंत्रज्ञानाचा विस्तार झाल्यानंतर येथील नागरिकांचे जीवन सुकर होणार आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर काश्मीर केंद्रशासित प्रदेश नसेल. काश्मीरला स्वतंत्र राज्य बनवू.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT