Court_2
Court_2 
देश

पतीची हत्या केल्यानंतरही पत्नीला मिळेल पेन्शन; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पंजाब हरियाणा हायकोर्टाने (Punjab and Haryana High Court) फॅमिली पेन्शनप्रकरणी (Family Pension) ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, पतीची हत्या करणाऱ्या महिलेचाही फॅमिली पेन्शनवर हक्क आहे. बलजीत कौरने 2008 मध्ये आपले पती तरसेम सिंह याची हत्या केली होती. पोलिसांनी 2009 मध्ये अंबालाची रहिवाशी असणाऱ्या बलजीतविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. 

Budget 2021: तुमच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलंय की, एखादी महिला आपल्या पतीची हत्या करते, तरीही तिला मिळणारी पेन्शन थांबवली जाऊ शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयाला फॅमिली पेन्शनच्या रुपात आर्थिक मदत केली जाते. मात्र, बलजीत कौरने आपल्या पतीची हत्या केल्यामुळे तिला फॅमिली पेन्शन दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका हरियाणा सरकारकडून घेण्यात आली होती. 

2011 मध्ये पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर बलजीत कौरची पेन्शन थांबवण्यात आली होती. त्यानंतर बलजीत कौरने हरियाणा सरकारच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. कोर्टाने आपल्या निर्णयात हरियाणा सरकारला आदेश दिलाय की त्यांनी दोन महिन्याच्या आता बलजीत कौरची सर्व शिल्लक पेन्शन द्यावी. कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक मानलो जातोय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT