rahul gandhi -anurag thakur
rahul gandhi -anurag thakur 
देश

बॅंकांच्या दिवाळखोरांची नावे जाहीर करा; राहुल गांधी यांची मागणी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - बॅंकांचे कर्ज बुडविणाऱ्यांची नावे जाहीर करावी, या राहुल गांधींच्या मागणीवरून लोकसभेत सोमवारी गदारोळ झाला. सरकारवर झालेला लपवाछपवीचा आरोप आणि प्रियांका गांधी -वद्रा यांच्या चित्राचा अर्थराज्य मंत्र्यांनी उपस्थित केलेला मुद्दा यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली.
 

प्रश्‍नोत्तराच्या तासात राहुल गांधींनी बॅंकांच्या दिवाळखोरांची नावे सरकारकडे मागितली. हा सोपा प्रश्‍न असून ५० दिवाळखोरांची नावे सांगावी, ज्यांनी देशातील बॅंकांमधून पैसे चोरले त्यांना परत आणण्याची मोदींनी घोषणा केली आहे. सरकारने नावे जाहीर केलेली नाहीत. बॅंक कर्जाच्या निमित्ताने राहुल यांनी अर्थव्यवस्थेवरूनही सरकारला चिमटे काढले. बॅंकिग व्यवस्था ढासळली असून या पुढच्या काळात बॅंकांना आणखी अपयशाला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. 

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर उत्तर देण्यासाठी उभे राहताच विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर द्यावे, अशी त्यांनी मागणी होती. राज्यमंत्री ठाकूर यांनी उत्तरादाखल राहुल यांचा आरोप फेटाळताना सर्व तपशील सरकारने दिल्याचा दावा केला. स्वतःहून दिवाळखोरी जाहीर करणाऱ्यांची नावे केंद्रीय माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर लगेच टाकली जातात. २५ लाखाहून अधिक रक्कम थकलेल्या दिवाळखोरांची नावे संकेतस्थळावर आहेत, याकडे लक्ष वेधताना अनुराग ठाकूर यांनी काही जण आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे होऊ दिले जाणार नाही, असा टोला लगावला. 

अनुराग ठाकूर यांचे उत्तर सुरू असताना विरोधी बाकांवरून गोंधळ सुरू होता. मात्र काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी - वद्रा यांचे चित्र येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांनी दोन कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या मुद्दा उपस्थित करून ठाकूर यांनी काँग्रेस खासदारांना डिवचले. 

या चित्राबद्दल बोलण्यासाठी आपल्याला आग्रह होतो आहे. मात्र यावर राजकारण करायचे नाही. कोणी चित्र विकले आणि कोणाच्या खात्यात रक्कम गेली असा सवाल ठाकूर  यांनी केला.

कर्जबुडव्यांच्या संख्येवरून राहुल गोंधळले
अर्थात, कर्जबुडव्यांच्या संख्येवरून राहुल गांधी यांचा सभागृहात आणि सभागृहाबाहेर चांगलाच गोंधळ झाल्याचेही दिसून आले. सभागृहामध्ये ५० जणांची नावे जाहीर करण्याचे आव्हान त्यांनी सरकारला दिले होते. बाहेर मात्र पत्रकारांशी बोलताना ५०० जणांची नावे सरकारने सांगायला हवी, असा आग्रह राहुल यांनी धरला. 

बॅंकांची बिघडलेली स्थिती आणि कोरोना व्हायरसचा प्रभाव यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जाणार आहे.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT