Rahul Gandhi  file Photo
देश

किती कुटुंबांच्या नशिबी ‘सुखी रोटी’? राहुल यांचा केंद्राला सवाल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला महागाईच्या मुद्द्यावरून पुन्हा लक्ष्य केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला महागाईच्या मुद्द्यावरून पुन्हा लक्ष्य केले. किती कुटुंबांना ‘सुखी रोटी’ खावी लागत आहे? किती विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागली अशा प्रश्नांच्या फेरी त्यांनी झाडल्या. ‘उत्तर स्पष्ट आहे, की महागाई वाढते आहे आणि आर्थिक उत्पन्न घटते आहे,‘ अशी टीका त्यांनी केली. (Rahul Gandhi On Central Government)

देशातील पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरु आहे. त्यात काँग्रेसही मागे नाही. राहुल यांनी ट्विटरवर एका वर्तमानपत्रातील बातमीचा संदर्भ दिला. जानेवारीत महागाई निर्देशांक ६.०१ टक्क्यांवर पोचल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ट्विटमध्ये त्यांनी काही प्रश्‍न देखील उपस्थित केले.

केंद्र सरकारवर महागाई वाढल्याचा ठपका ठेवताना लोकांचे आर्थिक उत्पन्न घटल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या वेदना आणि समस्या मोजणार कशा? अनेकांना जेवणाची भ्रांत आहे, मुलांना शाळा सोडावी लागली आहे. अनेक महिलांना महागाईमुळे त्यांचे दागिने गहाण ठेवावे लागले आहेत. अनेकांच्या तोंडावरील हास्य मोदी सरकारने हिरावून घेतले आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली सरकारवरही टीका

राहुल यांनी काल दिल्ली सरकारला लक्ष्य केले होते. दिल्लीतील अंगणवाडी सेविकांच्या वेतनाच्या मुद्द्यावर त्यांनी ट्विट केले. अंगणवाडी कार्यकर्त्यांची हक्काची लढाई योग्य आहे. त्यांनी कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता लोकसेवा केली, परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना योग्य वेतन देत नाही. त्यांना सन्मानाची वागणूकही मिळत नाही. हे केवळ नावाला आम आदमी आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम, 30% कंपन्या या ठप्प होण्याच्या मार्गावर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT