Rahul Gandhi Letter to Twitter CEO Sakal
देश

'ट्विटरला सरकारचा...', राहुल गांधींचं Twitter च्या सीईओंना पत्र

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ट्विटरला सरकारचा मोहरा बनू देऊ नका, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलंय. तसेच माझं ट्विटर अकाऊंट कुठलंही वैध कारण न देता ब्लॉक करण्यात आलंय. मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन ट्विटर हे करतंय, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Rahul Gandhi Letter To Twitter CEO) यांनी पत्र लिहिले आहे.

सरकारच्या काही धोरणांवर टीका-टीप्पणी केल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो दडपण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. या पत्रात त्यांनी काही डेटा विश्लेषण देखील दिले आहे. ट्विटर मोदी सरकारच्या दबावाखाली माझे फॉलोअर्स वाढू न देण्यासाठी प्रयत्न करतंय. ऑगस्ट २०२१ मध्ये माझं अकाऊंट कुठलंही कारण न देता ब्लॉक करण्यात आलं. त्यावेळी जितके फॉलोअर्स होते तितकेच आजही आहेत. अजून फॉलोअर्स वाढलेले नाहीत, असंही पत्रामध्ये म्हटलंय. याबाबत एडीटीव्हीनं वृत्त दिलं आहे.

राहुल गांधींनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानं त्यांचं अकाऊंट वादात सापडलं होतं. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांचा फोटो ट्विट करून त्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर परत त्यांचं अकाऊंट एक आठवड्यासाठी ब्लॉक करण्यात आलं होतं. कृषी कायदे आणि सरकारच्या इतर धोरणाविरोधात वारंवार टीका करत असल्यानं ट्विटर सरकारच्या दबावाखाली येऊन माझ्या अकाऊंटवर कारवाई करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यालयाचे डिजिटल कम्युनिकेशनचे प्रभारी, श्रीवत्स वायबी यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले होते की, ट्विटरकडून आम्हाला देण्यात आलेलं स्पष्टीकरण समाधानकारक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT