Rahul Gandhi Sakal
देश

जिथे कुठे सत्य, तिथे बापूजी अजूनही जिवंत : राहुल गांधी

महात्मा गांधीजींच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन त्यांना आज आदरांजली वाहिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘हिंदुत्त्ववाद्यांना वाटते की राष्ट्रपिता गांधीजी आता आपल्यात नाहीत, पण जिथे कुठे सत्य आहे, तिथे गांधीजी जिवंत आहेत,’ असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज म्हणाले. महात्मा गांधीजींच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन त्यांना आज आदरांजली वाहिली.

महात्मा गांधी म्हणजे हिंदू आणि गोडसे म्हणजे हिंदुत्ववाद अशा शब्दांत त्यांनी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून संघ, भाजपविरोधात आक्रमक टिका करत आहेत. त्या मालिकेत त्यांनी #GandhiForever हा हॅशटॅग वापरत गांधीजींना आदरांजली वाहिली. गांधीजींचे आवडते भजन रघुपती राघव राजाराम आणि गांधीजींचा चष्मा असलेले चित्र जोडून त्यांनी खोचक ट्विट केले. ते म्हणाले की, ‘एका हिंदुत्त्ववाद्याने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली.

सर्व हिंदुत्त्ववाद्यांना वाटते की गांधीजी जिवंत नाहीत. मात्र, जिथे कुठे सत्य असेल, तिथे बापू अजूनही जिवंत आहेत.’ आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांनी गांधीजींचे एक वाक्यही उद्‌धृत केले - ‘निराश झाल्यावर मी आजपर्यंतच्या इतिहासात सत्य आणि प्रेम यांचाच विजय झाला आहे, याचे स्मरण करतो. जगात अनेक क्रूर, खूनी होऊन गेले आणि ते अजिंक्य असल्याचा भासही काही काळ झाला, मात्र अखेरीस त्यांचा नाश होतोच. याचा नेहमी विचार करा.’ काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही अहिंसेबाबतचे विचार मांडून गांधीजींना आदरांजली अर्पण केली.

ज्योत मालविल्यावरून टीकास्त्र

काँग्रेसनेही गोडसेवादी विरुद्ध गांधीवादी असे ट्विट करून इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत मालविण्याचा निर्णय म्हणजे इतिहास मिटविण्याचा गोडसेवाद्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. जेव्हा गोडसे देशाचा इतिहास नष्ट करण्यासाठी येईल तेव्हा गांधी आपल्या हाताने इतिहास सावरतील, असे काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे. इंडिया गेटवरील अमर जवान स्मारक आणि मालविलेल्या ज्योतीचे छायाचित्र, सत्ताधारी भाजपच्या उलट्या निवडणूक चिन्हासह या ट्विटमध्ये दर्शविण्यात आले आहे.

अमर जवान ज्योत मालवून केंद्राने जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. काँग्रेस आता ही अमर जवान ज्योत छत्तीसगडला आणणार असून त्यासाठी रायपूरमध्ये युद्धस्मारक उभारले जाणार आहे. तीन फेब्रुवारीला राहुल गांधी यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन होईल.

- भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT