Bharaj Jodo Yatra new delhi
Bharaj Jodo Yatra new delhi esakal
देश

Bharaj Jodo Yatra : 'मीडियावाले विचारतात थंडी वाजत नाही का?' राहुल गांधींनी दिलं चोख उत्तर

संतोष कानडे

नवी दिल्लीः हरियाणा येथून भारत जोडो यात्रा दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. राहुल गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन यात्रेला संबोधित केलं. यावेळी यांनी केंद्र सरकारवर आणि माध्यमांवर आसूड ओढला.

राहुल गांधी म्हणाले की, मी देशामध्ये आतापर्यंत दोन हजार किलोमीटर फिरलो परंतु मला कुठंही हिंसा, द्वेष दिसला नाही. परंतु हे टीव्हीवाले २४ तास हिंसा पसरवित आहेत. जसा खिसेकापू सुरुवातीला आपलं लक्ष दुसरीकडे नेतो, तसंच हे मीडियावाले तुमचा खिसा कापून लक्ष दुसरीकडे वळवत आहेत.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पुढे बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, मीडियावाले मला विचारतात मला थंडी वाजत नाही का? परंतु हाच प्रश्न ते शेतकऱ्यांना का विचारत नाहीत? शेतीत, कंपन्यांमध्ये काम करणारे मजूर यांना हे विचारला जात नाही, हे दुर्दैव आहे. यांना २४ तास फक्त हिंदू-मुस्लिम वाद पाहिजे.

''हिंदू धर्म आणि देवदेवता भिऊ नका, असं सांगतात. परंतु हे भाजपवाले भीतीचं वातावरण तयार करीत आहे. माझ्या यात्रेमध्ये तुम्हाला भीती, हिंसा, धर्म, जात, भेदभाव काहीच दिसलं नसेल. कारण ही यात्राच भीती दूर करण्यासाठी आहे.''

सगळ्या कंपन्या त्यांच्या, रेल्वे त्यांची, लाल किल्ला त्यांचा...सर्व त्यांचंच आहे. परंतु आमचं सत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. आम्ही देशाचा तिरंगा श्रीनगरमध्ये जावून फडकवणार असल्याचं राहुल यांनी स्पष्ट केलं. ही यात्रा ३ जानेवारीपासून पुन्हा सुरु होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT