Rahul Gandhi On Contesting lok sabha election 2024 from amethi UP Electoral bond Marathi political news  
देश

Rahul Gandhi News : अमेठीतून लोकसभा निवडणूक लढणार का? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आज गाझियाबाद येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने निर्देश दिल्यास आपण अमेठीतून निवडणूक लढण्यास सशर्त तयार असल्याचे आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. अमेठीच्या संदर्भात आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आज गाझियाबाद येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढविण्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्षात उमेदवार ठरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक समिती आहे. या समितीने मला अमेठीतून निवडणूक लढण्याचा ठराव केला व या ठरावाला काँग्रेस श्रेष्ठीने होकार दिल्यास मला अमेठीतून निवडणूक लढण्यास कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमेठीत येत्या २५ मे रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक रोखे हे खंडणी योजना

केंद्र सरकारने राबविलेला निवडणूक रोखे ही योजना खंडणी वसूल करण्याचे रॅकेट होते, या रॅकेटचे संचालक पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. एका मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी निवडणूक रोखे हे राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी पारदर्शक पद्धती होती, असा दावा केला आहे. हा दावाही खोटा असून पारदर्शक पद्धती होती तर कंपन्यांचे नाव गुप्त राखण्याचे कारण काय आहे. ही संपूर्ण मुलाखतही आधीच ठरवून झालेली मुलाखत होती. ही मुलाखत एक फ्लॉप शो होता. निवडणूक रोख्यांच्या वसुली रॅकेटने पंतप्रधान हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन असल्याचे स्पष्ट झाल्याचा टोला त्यांनी हाणला.

भाजप हे भ्रष्टाचाराचे गोदामः अखिलेश यादव

देशातील सर्व भ्रष्टाचारी आता भाजपत आहेत. भाजप आता भ्रष्टाचाराचे गोदाम झाले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. उत्तरप्रदेशात डबल इंजिनचे सरकार असल्याचा गाजावाजा केला होता. परंतु प्रचारात मात्र आता एकाच व्यक्तीचे छायाचित्र दिसत आहे. डबल इंजिनवाल्या दुसऱ्या नेत्याचे (योगी आदित्यनाथ) छायाचित्र फलकांमधून गायब झाले आहे. निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींचे छायाचित्रही गायब होणार आहे. पश्चिम उत्तरप्रदेशातून सुरू झालेली ही सुनामी आता संपूर्ण उत्तरप्रदेशात पसरणार असून भाजपला फार कमी जागांवर विजय मिळेल, असा दावाही अखिलेश यादव यांनी केला.

भाजपला १५० जागा

यावेळी भाजपला केवळ १५० जागा मिळतील, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला. आतापर्यंत आम्ही १८० जागा देत होतो. परंतु आता स्थिती बदलली असून

भाजपला आता १५० पेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT