Shrikant Sharma 
देश

राहुल यांच्याकडून जनतेची दिशाभूल - भाजप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत राहुल यांच्याकडून राजकारण करण्यात येत असून, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केली आहे.

देशातील उद्योगपती 50 कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा यज्ञ केला. या यज्ञात त्यांनी गरिबांचा बळी दिला. या निर्णयापासून 50 दिवसांत देशात काहीही बदल झालेला नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

श्रीकांत शर्मा म्हणाले, की राहुल जे काही म्हणत आहेत, तो त्यांचा आततायीपणा आहे. राहुल चोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांवर आरोप करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या देशाची तिजोरी कशी लुटली गेली, याचे उत्तर देशातील जनता मागत आहे. सत्तेत असताना त्यांनी स्वीस बँक का आठवली नाही. काँग्रेसचे केजरीवालकरण झाले असून, ते सतत खोटे बोलत आहेत. 2 जी, कॉमनवेल्थ आणि हेलिकॉप्टर घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैसे कोणी खाल्ले. देशातील जनतेने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवणे बंद केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT