rajnath.jpg
rajnath.jpg 
देश

किनारपट्टीला धोका कायम : राजनाथ सिंह 

पीटीआय

मुंबई (पीटीआय) : भारताच्या किनारपट्टीला दहशतवादी घटनांचा धोका कायम असून, देशाचे स्थैर्य धोक्‍यात आणण्यासाठी शेजारी देश अशा कारवायांमध्ये गुंतला आहे, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. राजनाथ सिंह हे अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

"प्रत्येक देशाकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा असणे आवश्‍यक आहे. भारताच्या किनारपट्टीला दहशतवादी कारवायांपासून धोका असल्याची शक्‍यता आम्ही नाकारत नाही. आपला शेजारी देश अस्थिरता माजविण्यासाठी वारंवार कारस्थाने करीत आहे. मात्र, देशाच्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आपले नौदल सक्षम असून, मुंबई हल्ल्यासारखी घटना पुन्हा घडणार नाही,' असे राजनाथ सिंह म्हणाले. 

राजनाथ सिंह हे एक रात्र आयएनएस विक्रमादित्यवर होते. या वेळी त्यांच्या उपस्थितीत नौदलाने युद्धसराव केला. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT