Rajya Sabha Election esakal
देश

Rajyasabha Election : धजद-भाजप युतीच्या पाचव्या उमेदवारामुळं चुरस वाढली; काँग्रेसमध्ये प्रचंड घबराट

भाजप आणि धजदच्या युतीने (BJP and JDS Alliance) कुपेंद्र रेड्डी यांना राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभेच्या चार जागांसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

बंगळूर : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) चार जागांसाठी या महिन्याच्या २७ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप-धजद युतीचे कुपेंद्र रेड्डी यांनी गुरुवारी (ता. १५) पाचवा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे चुरस वाढली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसला (Congress) तीन, तर भाजपला एक जागा सहज जिंकता येईल. आता पाचवा उमेदवार रिंगणात उतरल्याने सत्ताधारी काँग्रेस पक्षाला एकप्रकारे आव्हान दिल्यासारखे आहे.

भाजप आणि धजदच्या युतीने (BJP and JDS Alliance) कुपेंद्र रेड्डी यांना राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये घबराट निर्माण झाली आहे. काँग्रेसला निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा धोका आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ४५ आमदारांची गरज आहे.

काँग्रेसचे १३५, भाजपचे ६६ आणि धजदचे १९ आमदार आहेत. त्यांच्यासोबत कल्याण राज्य प्रगती पक्षाचे जनार्दन रेड्डी, सर्वोदय कर्नाटक पक्षाचे दर्शन पुट्टन्नय्या, हरपनहळ्ळीच्या लता मल्लिकार्जुन (अपक्ष), गौरीबिदनूरचे के. पी. पुट्टस्वामी यांच्यापैकी दर्शन पुट्टन्नय्या, लता मल्लिकार्जुन, पुट्टास्वामी यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. जनार्दन रेड्डी यांनी सुरुवातीला काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते, पण आता ते भाजपकडे झुकत असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस त्यांच्या तीन उमेदवारांना प्रत्येकी ४५ मतांचा कोटा निश्‍चित केला आहे. तीन अपक्षांची मते काँग्रेसकडे येऊ शकतात, असे सांगितले जात असले तरी, जनार्दन रेड्डी आणि दर्शन पुट्टनय्या या अपक्ष सदस्यांची मते आपल्याकडे खेचण्याचाही भाजप प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येते. युतीचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना ४० मते मिळतील. ज्यात धजदच्या १९ मतांसह भाजपच्या अतिरिक्त २१ मते मिळू शकतात. कुपेंद्र रेड्डी यांना विजयासाठी आणखी पाच मतांची गरज असून भाजप-धजद युतीने काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांना वेठीस धरून ही मते जिंकण्याची तयारी करू शकते.

उमेदवारांकडून अर्ज दाखल

राज्यसभेच्या चार जागांसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसकडून अजय माकन, नसीर सय्यद हुसेन, जी. सी. चंद्रशेखर यांनी अर्ज दाखल केला. तर भाजपचे नारायण बंडा यांनी अर्ज दाखल केला. कुपेंद्र रेड्डी यांनीही युतीचे पाचवे उमेदवार म्हणून अर्ज सादर केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार कॉंग्रेस उमेदवारांसोबत उपस्थित होते. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक हे भाजप उमेदवारासोबत होते. सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज विधानसभा सचिव आणि निवडणूक अधिकारी विशालाक्षी यांच्याकडे सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT