ramayan 
देश

‘दूरदर्शन’वर पुन्हा रामायण;  खास लोकाग्रहास्तव होणार प्रसारण 

पीटीआय

नवी दिल्ली -  कधीकाळी सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रामानंद सागर यांची रामायण ही पौराणिक मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जनतेच्या मागणीचा सन्मान ठेवून आम्ही या मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू करत आहोत अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.

‘‘सध्या संपूर्ण देश लॉकडाउनला सामोरे जात आहे, अशा स्थितीमध्ये बहुसंख्य नागरिकांनी मनोरंजनासाठी रामानंद सागर यांचे ‘रामायण’ आणि बी. आर. चोप्रा यांचे ‘महाभारत’ या दोन्ही मालिकांचे पुन:प्रसारण केले जावे अशी मागणी केली होती, सध्या आम्ही त्यावर काम करत आहोत,’’ असे प्रसारभारतीचे सीईओ शशी शेखर यांनी सांगितले. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर शेखर यांनीही जावडेकर आणि सागर कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. कधीकाळी दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका सुरू झाल्यानंतर अक्षरशः रस्ते रिकामे होत असत, आता लॉकडाउनमुळे रस्तेच ओस पडल्याने रामायणच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

जनतेच्या मागणीनुसार आम्ही उद्या शनिवार २८ मार्चपासून दूरदर्शनवरून रामायण या पौराणिक मालिकेचे पुन:प्रसारण करत आहोत. सकाळी नऊ ते दहादरम्यान ही मालिका प्रसारित केली जाईल. सायंकाळी नऊ ते दहा दरम्यान ही मालिका दाखविण्यात येईल. 
-प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT