Narendra Modi And Fake Notes esakal
देश

देशात बनावट नोटांची संख्या वाढली, विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशात बनावट नोटा वाढल्या, रिझर्व्ह बँकेच्या अहवालात स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून विरोधी पक्षांना नवीन दारुगोळा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या (Demonetization) २०१६ मधील निर्णयावर जोरदार हल्लाबोल विरोधकांनी केला. आरबीआयच्या अहवालानुसार, बनावट नोटांची संख्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये वाढली आहे. आरबीआयने (RBI) १०१.९ टक्क्यांपेक्षा अधिक ५०० रुपयांच्या बनावट नोटा (Fake Notes) आणि ५४.१६ टक्क्यांपेक्षा अधिक २००० रुपयांच्या बनावट नोटा शोधल्या आहेत. (RBI Report Shows Fake Notes Increases In Country, Opposition Parties Attack On Modi Government)

या शिवाय काळा पैसा संपवणे, नकली नोटा हद्दपार करणे आदी कारणामुळे नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतला होता. आता या नवीन अहवालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, नोटाबंदीचा केवळ दुर्भाग्य यशामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे.

तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते डेरेक ओ'ब्रिएन ट्विट करत हल्ला केला आहे. नमस्कार पंतप्रधान मोदी. नोटाबंदी ? आठवल का ? आणि ममता बॅनर्जी यांनी तुम्हाला धारेवर कसे धरले होते? कसे तुम्ही देशाला वचन दिले होते, की नोटाबंदीमुळे बनावट नोटा हद्दपार होतील. हा आहे आरबीआयचा अहवाल त्यातून बनावट नोटा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे, असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT