देश

Delhi Elections : भाजपच्या पराभवाची मालिका आता सुरु : शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला. या विजयामुळे मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही. हा विजय निश्चित होताच. यापूर्वी इतर काही राज्यात भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतही पराभव झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाची मालिकाच सुरु झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सांगितले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, दिल्लीमध्ये करोलबाग येथे मराठी भाषिक आहे. दिल्ली सरकारने पाणीपट्टी कमी केली. मुलांना शिस्तीचे आणि सक्तीच्या शिक्षणाची सोय केली. तसेच दिल्ली देशाच्या इतर शहरापेक्षा वेगळी आहे. दिल्लीचा निर्णय हा दिल्लीपूरता मर्यादित नाही. आपचा या निवडणुकीत विजय होणार होता आणि तो झाला. या विजयामुळे आश्चर्य वाटत नाही. 

दहशतीविरुद्ध लोकांची मतं  

अहंकार जो होतो त्याविरोधात जनता व्यक्त झाली आहे. संसदेतील सदस्य आणि सर्वांमध्ये जी नाराजी आहे आणि हीच नाराजी आता निकालातून समोर येत आहे. दिल्लीसह अनेक राज्यात भाजपचा पराभव होत आहे. आता पराभवाची मालिका सुरु झाली आहे. दहशतीविरूद्ध लोकांनी मतं दिली.

धार्मिक कटूता वाढेल असे काम

धार्मिक कटूता वाढेल असे काम भाजपने केले आहे. मारा, गोळ्या घाला, मर्यादा सोडून घोषणा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भाजपचा पराभव होणार हे निश्चित होते. आता ही मालिका आहे थांबणार नाही. 

भाजप ही आपत्ती

भाजप ही एकप्रकारची आपत्तीच आहे. ती काहीही करून आपण घालवली पाहिजे. दहशतीच्या वातावरणामुळे भाजपचा पराभव झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT