देश

अफवांवर विश्वार ठेऊ नका; पुणे-बंगळूरु महामार्गाची 'ही' आहे खरी परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा

शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे.

सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन दिवसापासून वाहतूक ठप्प आहे. आज महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली; मात्र त्यानंतर पाणी पातळी स्थिर आहे.

दरम्यान महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूची (दूध, भाजीपाला, पेट्रोल -डिझेल) वाहनाची व अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्याबाबत सत्यता तपासण्यासाठी फोन खणखणू लागलेत; मात्र प्रत्यक्षात महामार्गावरून कोणतेही वाहतूक सुरू झालेली नाही.

सांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT