देश

अँटिबॉडीजमुळे कोरोनापासून संरक्षण नाही; संशोधकांचा दावा 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - मानवी शरीरातील अँटिबॉडीज अथवा प्रतिपिंडांमुळे व्यक्तीचे नेहमीच कोरोना अथवा सार्सच्या विषाणूंपासून संरक्षण होत नाही. या अँटिबॉडीज मानवी शरीरामध्ये कितीकाळ टिकतात किंवा टिकाव धरणारे त्यांचे अन्य उपप्रकार कोणते आहेत, याचा अंदाज वर्तविणे कठीण असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी शरीरातील अँटिबॉडीजमुळे मानवी शरीरात काही सकारात्मक परिणाम घडून येत असल्याचे आढळून आले होते. संशोधक आता या परिणामांचा गांभीर्याने अभ्यास करत आहेत. अँटिबॉडीजच्या प्रभावाबाबत संशोधकांमध्ये मतैक्य नाही, याबाबत केवळ वेगवेगळे अंदाजच वर्तविण्यात येतात, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या अँटिबॉडीज आढळून आल्या तर त्यावरून एक निष्कर्ष मात्र निश्‍चितपणे काढता येतो तो म्हणजे त्या व्यक्तीला या आधी कोरोनाची बाधा झाली होती. संशोधनातून आता हाती आलेले पुरावे आपल्याला नेमके कोणत्या दिशेला घेऊन जातात, हे काळजीपूर्वक पाहावे लागेल असे विषाणूतज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभाव उघड नाही
शरीराच्या विविध भागांमध्ये अँटिबॉडीजची निर्मिती होते, असे पुण्यातील आयसर संस्थेतील संशोधक विनिता बाल यांनी सांगितले. देशात याआधी अनेक भागांत सिरो सर्व्हे करण्यात आले होते; पण त्यातूनदेखील अँटिबॉडीजचा प्रभाव उघड झालेला नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT