Yogi Aadityanath Sakal
देश

आधीचे सरकार असताना दर तीन दिवसांनी दंगल : योगी आदित्यनाथ

आधीच्या सरकारच्या राजवटीत दर तीन दिवसांनी दंगल व्हायची. त्यामुळे विकासात अडथळे येऊन राज्याची पीछेहाट झाली होती.

वृत्तसंस्था

लखनौ - आधीच्या सरकारच्या राजवटीत दर तीन दिवसांनी दंगल (Riot) व्हायची. त्यामुळे विकासात अडथळे येऊन राज्याची पीछेहाट झाली होती, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी केला.

विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचा उल्लेख न करता ते म्हणाले की, २००३ ते २०१७ दरम्यान शासन केलेल्यांकडे विकासाची दूरदृष्टी नव्हती. सामान्य माणसाला व्यवसाय आणि रोजगारासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात त्यांना अपयश आले. या कालावधीत कोणताही सण शांततेत साजरा होऊ शकला नाही. त्यासाठी सुरक्षा पुरविण्यात आधीचे सरकारे अपयशी ठरली. अनागोंदी, गुंडगिरी, गैरव्यवस्थापनाचा फटका बसला. युवकांसमोर अस्तित्व हीच समस्या ठरली. उत्तर प्रदेशात आधीच्या राजवटीत केवळ दोन्ही गटांची वित्त आणि जिवीत हानी झाली. यात अखेरीस राष्ट्राचे नुकसान झाले.

आपले सरकार आल्यानंतर उद्योगस्नेही वातावरणाच्या क्रमवारीत राज्याने १४वरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. परदेशी गुंतवणूकदारांच्या पसंतीमध्ये हे राज्य पहिल्या तीन क्रमांकांत आहे. कोरोनाच्या जागतिक साथीत चीन ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गमावत असताना उत्तर प्रदेश देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले.

- योगी आदित्यनाथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT