Yogi Aadityanath Sakal
देश

आधीचे सरकार असताना दर तीन दिवसांनी दंगल : योगी आदित्यनाथ

आधीच्या सरकारच्या राजवटीत दर तीन दिवसांनी दंगल व्हायची. त्यामुळे विकासात अडथळे येऊन राज्याची पीछेहाट झाली होती.

वृत्तसंस्था

लखनौ - आधीच्या सरकारच्या राजवटीत दर तीन दिवसांनी दंगल (Riot) व्हायची. त्यामुळे विकासात अडथळे येऊन राज्याची पीछेहाट झाली होती, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी केला.

विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचा उल्लेख न करता ते म्हणाले की, २००३ ते २०१७ दरम्यान शासन केलेल्यांकडे विकासाची दूरदृष्टी नव्हती. सामान्य माणसाला व्यवसाय आणि रोजगारासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात त्यांना अपयश आले. या कालावधीत कोणताही सण शांततेत साजरा होऊ शकला नाही. त्यासाठी सुरक्षा पुरविण्यात आधीचे सरकारे अपयशी ठरली. अनागोंदी, गुंडगिरी, गैरव्यवस्थापनाचा फटका बसला. युवकांसमोर अस्तित्व हीच समस्या ठरली. उत्तर प्रदेशात आधीच्या राजवटीत केवळ दोन्ही गटांची वित्त आणि जिवीत हानी झाली. यात अखेरीस राष्ट्राचे नुकसान झाले.

आपले सरकार आल्यानंतर उद्योगस्नेही वातावरणाच्या क्रमवारीत राज्याने १४वरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. परदेशी गुंतवणूकदारांच्या पसंतीमध्ये हे राज्य पहिल्या तीन क्रमांकांत आहे. कोरोनाच्या जागतिक साथीत चीन ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गमावत असताना उत्तर प्रदेश देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले.

- योगी आदित्यनाथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT