Salman Khan
Salman Khan 
देश

युद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे: सलमान खान

वृत्तसंस्था

मुंबई  अभिनेता सलमान खान हा त्याच्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत असतो. भारत-पाकिस्तानदरम्यान सीमारेषेवरील तणावावर भाष्य करताना आता सलमानने "युद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे', असे म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रस्थापित होण्याचे प्रयत्न व्हावेत, असेही सलमान या वेळी म्हणाला.

युद्धामुळे कोणालाही फायदा होणार नाही. दोन्ही देशांमधील समस्यांवर युद्ध हा उपाय नव्हे, असे सांगत पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत सलमानने एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सलमान इतकेच बोलून थांबला नाही, तर जे लोक युद्धाचा आदेश देतात, त्यांच्या हातात बंदुका देऊन त्यांना प्रत्यक्ष सीमारेषेवर लढायला पाठवावे. जेव्हा ते लोक गुडघ्यावर येतील, तेव्हा सर्व वाद आपोआप मिटतील, असेही सलमान म्हणाला. युद्धामुळे दोन्ही देशांचे सैन्य नाहक मारले जाते. या सैनिकांची कुटुंबे असहाय होतात, असेही सलमान म्हणाला.

सलमान खान त्याच्या आगामी ट्युबलाइट चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आला असताना हे वक्तव्य केले. ट्युबलाइट हा सिनेमा 1962 मध्ये घडलेल्या भारत-चीनदरम्यानच्या युद्धावर आधारित आहे. याआधी सलमानने बलात्कार पीडितांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT