Sanbor Shullai 
देश

Loksabha 2019 : '...तर मोदींसमोरच आत्महत्या करेल'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (Citizenship Amendment Bill) विरोध दर्शविला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आत्महत्या करेन, असे या भाजपचे उमेदवार सनबोर शुलाई यांनी म्हटले आहे.

मेघालयातील शिलाँग मतदार संघातून शुलाई हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू होऊ देणार नाही. यासाठी मला जीव द्यावा लागला तरी चालेल. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आत्महत्या करेन. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक अमलात आणू देणार नाही.'

मेघालयात लोकसभेच्या शिलाँग आणि तुरा या दोन जागा आहेत. या दोन्ही जागा येथील स्थानिक आदिवासी समुदायांसाठी आरक्षित आहेत. गुरुवारी (ता. 11) लोकसभेच्या दोन्ही जांगासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी भाजपाचे उमेदवार सनबोर शुलाई यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले तर बांगलादेशातून आलेल्या निर्वासित हिंदूंची संख्या वाढेल आणि स्थानिकांची कमी होईल अशी भीती आसाममधील नागरिकांना वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT